मुख्यत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांकडून बहिष्कार
नागपूर मध्ये सोमवारपासून राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. आज या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली असून, या बैठकीनंतर पत्रकारपरिषदही घेण्यात अली. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांकडून बहिष्कार टाकण्यात आल्याचेही यावेळी जाहीर केले आहे.
दरम्यान, अजित पवार म्हणाले कि, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने मनमोकळी अनौपचारिक चर्चा होईल, या हेतूने आम्हाला बोलावले होते. पण आम्ही आता सगळ्यांनी चर्चा केली, त्या चर्चेत साधारण सहा महिने झाले हे सरकार सत्तेवर येऊन, या कालावधीत ज्या काही अफेक्षा होत्या पूर्ण झाल्यात असे आम्हाला अजिबात वाटत नाही. महापुरुषांबाबत सातत्याने बेताल वक्तव्ये करणे, अपशब्द बोलणे हे सतत सुरूच आहे. राज्यपाल, मंत्री, आमदार हे बोलत आहेत आणि त्यात भर टाकण्याचे काम करत आहेत. काही बाबतीत माफी मागण्यासही तयार नाहीत. हे महाराष्ट्राला अजिबात पसंत नाही. हा एक आमचा मुद्दा आहे.”
स्वविचाराने व महाराष्ट्र हिताचा कारभार हाताळण्याचा अभाव सर्वच क्षेत्रात दृष्टीस येत असताना, मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे आम्हाला योग्य वाटत नाही. आपण आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमास उपस्थित न राहण्याचा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतलेला आहे, लोकशाहीच्या प्रथा परंपरेप्रमाणे विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस चहापान कार्यक्रमास निमंत्रित केल्याबद्दल पुन्श्च आभार, धन्यवाद.” असे म्हणत चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे अजित पवारांनी जाहीर केले आहे.
याशिवाय आपल्या राज्यातील मोठ्याप्रमाणवर उद्योग बाहेरील राज्यात पळवण्यात आले आहेत. आपल्या राज्यातील लाखो युवकांना रोजगार मिळणार होता, लाखो कोटींची गुंतवणूक विविध प्रकल्पांच्या माध्यमातून होणार होती. मोठ्या उद्योगांवर अवलंबून असणारे छोटे-मोठे उद्योगही निर्माण होणार होते. या सगळ्यांना महाराष्ट्र मुकला आहे. नवीन प्रकल्प आणले तर त्याचे आम्ही स्वागतच करू. विरोधला विरोध करण्याची भूमिका आमची अजिबात नाही. चर्चा झाली पाहिजे, चर्चेतून उत्तर मिळाली पाहिजेत, समाधान झाले पाहिजे. आम्ही तीन आठवड्याचे अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. दोन वर्षे करोनामुळे अधिवेशन झाले नाही त्यामुळे साहाजिकज विदर्भ-मराठवाडा या मागासलेल्या भागाच्या प्रश्नाच्या संदर्भात इथल्या सर्वांगीण विकासासाठी वेळ मिळायला पाहिजे होता, तो वेळ मिळाला नाही. म्हणून हे अधिवेशन तीन आठवड्याचे घेऊन ती भर काही प्रमाणात भरून काढण्याचा प्रयत्न हा जर सरकारने केला तर विरोधी पक्षाच्यावतीने तशाप्रकारची मागणीदेखील आहे की अधिवेसन तीन आठवड्यांचे घ्यावे.
News Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055