Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AgnipathNewsUpdate : वादग्रस्त “अग्निपथ” योजनेवरून प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप …

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : मोदी सरकारच्या नवीन अग्निपथ योजनेबाबत देशात मोठा गदारोळ झाला असून या योजनेच्या विरोधात तरुणांकडून हिंसक आंदोलन करण्यात येत आहे . यावर आपली गंभीर प्रतिक्रिया देताना हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गुप्त अजेंडा असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.


आपल्या ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे कि , “अग्नवीर योजनेमागे भाजप आणि आरएसएसचा छुपा अजेंडा आहे. सरकारी तिजोरीवरील भार कमी करणे, बेरोजगार तरुण सैनिक तयार करणे, ज्यामुळे नाझींसारखे सैन्य तयार होण्यास मदत होईल आणि या नाझी सैन्याचा उपयोग वैदिक हिंदु राष्ट्र उभारण्यासाठी होऊ शकेल.”

Advertisements

या योजनेला विरोध करण्यासाठी देशातील तरुणांकडून अनेक राज्यात याविरोधात हिंसक आंदोलने सुरू आहेत. अनेक राज्यात  रेल्वे, बसेस जाळण्यात आल्या आहेत. विरोधी पक्षांकडूनही याला कडाडून विरोध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर  अग्निपथ योजनेवरुन भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला लक्ष्य करताना प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप करताना अग्निवीर या योजनेमागे भाजप आणि आरएसएसचा गुप्त अजेंडा आहे असे म्हटले आहे.

Advertisements
Advertisements

तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांची पहिल्यांदाच पत्रकार परिषद

या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर यांनी आणखी एक प्रश्न उपस्थित करताना दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे कि , यापूर्वी कधीही लष्कर, नौदल आणि हवाई दलाने भरतीबाबत संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली नव्हती. मग यावेळीच  का? मोदीजींच्या मंत्र्यांनीअग्नीवीरशी संबंध ठेवण्यापासून स्वतःला वेगळे केले आहे, म्हणून ते तीन लष्करप्रमुखांवर अवलंबून आहेत?

सरकार आपल्या निर्णयावर ठाम

दरम्यान आज तिन्हीही दलाच्या प्रमुखांनी या योजनेचे समर्थन करीत येत्या दोन दिवसात भरती प्रक्रियेची अधिसूचना जारी करून अर्ज नोंदणी सुरु केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. तसे जे बदल जारी करण्यात आले आहेत त्याचा आणि आंदोलनाचा काहीही संबंध नसून ते आधीच योजनेत प्रस्तावित असल्याचेही त्यांनी सांगितले. आज  तिन्ही लष्करांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि त्यात अग्निपथ योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेत लष्कर, नौदल आणि हवाई दलातील भरती प्रक्रियेबाबतही माहिती देण्यात आली आहे.

लष्कर प्रमुख मनोज पांडे यांनी आधीच सांगितले आहे की अग्निवीरांची पहिली टीम डिसेंबर 2022 पर्यंत आमच्या रेजिमेंटल केंद्रांमध्ये सामील होईल आणि त्यांना पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत तैनातीसाठी उपलब्ध करून दिले जाईल. वायुसेनेनेही अग्निवीरांच्या भरतीची घोषणा केली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेबद्दल संपूर्ण तपशीलवार माहिती जाणून घेऊया.

‘अग्नीवीर’ संख्या 1.25 लाखांपर्यंत पोहोचेल…

योजनेचे विश्लेषण करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही पहिल्या वर्षी 46,000 भरती करून छोटी सुरुवात केली आहे. नजीकच्या भविष्यात आमचा ‘अग्नीवीर’ संख्या 1.25 लाखांपर्यंत पोहोचेल. भारतीय हवाई दलाचे अधिकारी एअर मार्शल एसके झा म्हणाले, अग्निवीर बॅच क्रमांक 1 नोंदणी प्रक्रिया 24 जूनपासून सुरू होईल आणि पहिला टप्पा ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया 24 जुलैपासून सुरू होईल. पहिल्या बॅचची डिसेंबरपर्यंत नोंदणी केली जाईल आणि 30 डिसेंबरपर्यंत प्रशिक्षण सुरू होईल. अग्निपथ योजनेबद्दल, भारतीय नौदलाचे व्हाइस अॅडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले की, या वर्षी 21 नोव्हेंबरपासून पहिले नौदल ‘अग्नीवीर’ प्रशिक्षण प्रतिष्ठान आयएनएस चिल्का, ओडिशा येथे पोहोचण्यास सुरुवात होईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!