CoronaAurangabadUpdate : जिल्ह्यात एक लाख 41 हजार 470 कोरोनामुक्त, 905 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 100 जणांना (मनपा 20, ग्रामीण 80) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 41 हजार 470 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 115 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 45 हजार 781 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 406 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 905 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (26)
औरंगाबाद 1, जूना बाजार 1, मोंढा नाका 1, सिंधी कॉलनी 1, एन-5 येथे 1, लालबाग 1, पुंडलिक नगर 1, पद्मपुरा 1, चिकलठाणा 3, छावणी 1, एन-12 येथे 1, डीकेएमएम हॉस्पीटल 2, टी.व्ही.सेंटर 1, भगतसिंग नगर 1, रेल्वेस्टेशन 1, शिवाजी नगर 1, अन्य 7
ग्रामीण (89)
रांजणगाव 4, शेवगाव 1, पिंपळगाव, ता.सिल्लोड 1, यशवंत नगर ता.पैठण 1, एन-9 येथे 1, पैठण 2, अन्य 79
मृत्यू (02)
घाटी (01)
1. पुरूष/45/गारखेडा, औरंगाबाद.
खासगी रूग्णालय (01)
1. स्त्री /40/ शेवता,ता. पैठण