Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HatharasGangRapeandMurder : आदरणीय योगी आदित्यनाथजी …भाजप नेत्या उमा भरती यांनी ट्विटद्वारे व्यक्त केली गंभीर मते…

Spread the love

उत्तर प्रदेशाच्या हाथरस  सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात भाजपच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह केंद्रीय मंत्री निरंजन ज्योती यांनी युपीतील आपल्याच पक्षाच्या सरकारला फाटकारताना पोलिसांच्या संशयास्पद कारवाईवरून प्रश्न उपस्थित केले आहेत. उमा भारती यांनी उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणी एकामागून एक ट्विट केलं आहे. एसआयटी तपासादरम्यान पीडित कुटुंब कुणालाही भेटू शकत नाही, असा कोणताही नियम नाही. असं केल्यास एसआयटीचा तपासावर संशय घेतला जाईल. कोरोनामुक्त झाल्यावर लवकरच हाथरस गाठून पीडित कुटुंबाला भेटणार आहे, असे  उमा भारती यांनी म्हटले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर उमा भारती यांच्यावर ऋषिकेशमधील एम्समध्ये उपचार सुरू आहेत.

युपी सरकार आणि जिल्हा प्रशासनावर हाथरस प्रकरणावरून चौफेर हल्ले होत असताना आता एनडीए आणि भाजपमधूनही सूर टीकेचे उमटू लागले आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनीही हाथरस प्रकरणावर मोठं विधान केलं आहे. “हे योग्य झालेलं नाही. पीडितेचा मृतदेह कुटुंबाकडे सोपवायला पाहिजे होता, असं ज्योती म्हणाल्या. दरम्यान घटना घडल्याच्या चार दिवसानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणारची माहिती समोर आली आहे.

उत्तर प्रदेशाचे  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संबोधून उमा भरती यांनी आपले ट्विट केले आहेत.  ‘मी हाथरसच्या घटनेबद्दल पाहिलं. तुम्ही या प्रकरणी योग्य कारवाई करणार. यामुळे या प्रकरणी बोलू नये असा आधी विचार केला. पण पोलिसांनी ज्या पद्धतीने गावाला आणि पीडितेच्या कुटुंबाला वेढा घातला आहे, यावरून अनेक तर्क लावले जाऊ शकतात. ती एका दलित कुटुंबातील मुलगी होती. पोलिसांनी घाईघाईने तिच्यावर अंत्यसंस्कार केले आणि आता पीडितेच्या कुटुंबाला आणि गावालाच पोलिसांनी वेढा घातला आहे, असं म्हणत पोलिसांनी योगी सरकारच्या कारवाईवर बोट ठेवलं आहे.

उमा भरती यांनी नेते आणि माध्यमांना पीडितेच्या घरी आणि गावात जाऊ न देण्याच्या मुद्द्यावरही मुद्यावरही भाष्य केले आहे. ‘एसआयटी तपासणीदरम्यान कुटुंब कुणालाही भेटू शकणार नाही, असा कोणताही नियम नाही. यामुळे एसआयटीचा तपास संशयाच्या भोवऱ्यात येईल, असा इशारा उमा भारतींनी दिला. पोलिसांच्या संशयास्पद कृतीने त्यांच्या आणि पक्षाच्या प्रतिमेला झळ बसली आहे, असं उमा भाजप योगी आदित्यनाथ यांना म्हणाल्या आहेत. ‘आपण नुकतीच राम मंदिराची पायाभरणी केली आहे आणि राज्यात रामराज्य आणण्याचा दावा केला आहे. पण या घटनेबाबत पोलिसांच्या संशयास्पद कारवाईने तुमचे सरकार आणि भाजपाच्या प्रतिमेला झळ बसली आहे. तुम्ही अगदी स्वच्छ प्रतिमेचे नेते आहात. यामुळे मीडियाच्या प्रतिनिधींना आणि इतर राजकीय पक्षांना पीडितेच्या कुटुंबाला भेटू द्या, असं आपल्याला आवाहन करते, असं उमा भारती म्हणाल्या आहेत.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!