MaharashtraNewsUpdate : राहुल गांधी हवेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष , बाळासाहेब थोरात यांचे पत्र
केवळ काँग्रेसला नव्हे तर देशाला ‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासारख्या पुरोगामी नेतृत्वाची गरज आहे, त्यामुळे त्यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
संगमनेरमध्ये बोलताना थोरात म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले पाहिजे. केवळ पक्षासाठी नाही तर देशालाही त्यांच्यासारख्या पुरोगामी नेतृत्वाची गरज आहे. एक समर्थ नेतृत्व, देशाला पुढे घेऊन जाणारे नेतृत्व राहुल गांधीच देऊ शकतात. सोनिया गांधी आज पक्षाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी या काळात खूप चांगले काम केले. एक समर्थ नेतृत्व त्यांनी दिले. त्यांना पाहिजे तोपर्यंत त्या अध्यक्ष राहतील. मात्र, त्यानंतर राहुल गांधी यांनी नेतृत्व करण्यासाठी तयार रहावे, आम्ही त्यांच्या पाठीश भक्कमपणे उभे राहू.’
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदासाठी महाराष्ट्र काँग्रेसने सोनिया गांधींना एकमताने पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र काँग्रेसने पत्रकही जारी केलं आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यावर काँग्रेसमध्येच विविध मतप्रवाह निर्माण झाले आहेत. पक्षाचे अध्यक्षपद गांधी कुटुंबियांपेक्षा बाहेरच्या व्यक्तीला देण्यात यावे, अशीही एक सूचना पुढे आली आहे.