Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बेपर्वाईने गाड्यांची तपासणी कारण्याऱ्यांवर कडक कारवाईची अंबादास दानवे यांची मागणी

Spread the love

विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या, विधानपरिषद सभागृहात, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दरवर्षी परिवहन विभागाकडून गाड्यांची तपासणी केली जाते, त्या दरम्यान बेपर्वाई केली जात असल्याचे निदर्शनास आणत यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

विधानपरिषद सभागृहात, आमदार सचिन अहिर यांनी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या खासगी बसचा झालेला अपघातावर लक्षवेधी उपस्थित केली होती. त्याला अनुसरून अंबादास दानवे यांनी परिवहन विभागाकडून गाड्यांची तपासणी होत असताना बेपर्वाई होत असल्याचा आरोप केला. तसेच अपघात झालेल्या बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी भरण्यात येते का? त्यात किती प्रवासी प्रवास करत होते? हे प्रश्न उपस्थित केले. मोठया प्रवासादरम्यान मध्येच प्रवासी घेऊ नये असे नियम असताना बसचालक या नियमांचे उल्लंघन करतात असा आरोप दानवे यांनी या वेळी केला आहे.

 

#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

 

News Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!