आपण जी भूमिका घेतली आहे, त्यामध्ये बदल होणार नाही, असे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो – अजित पवार

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या बैठकांच आयोजन करण्यात आले होते. आता कुठेही मॅचफिक्सिंग नाही, आपण जी भूमिका घेतली आहे, त्यामध्ये बदल होणार नाही, असे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असे भाष्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच मार्च महिन्यात आचारसंहिता लोकसभा लागण्याची शक्यता असल्याने संघटनात्क काम वाढवा लक्ष द्या अशा सूचना देखील त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मंत्रालयाजवळील महिला विकास मंडळ सभागृहात राष्ट्रवादींच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान ते म्हणाले मार्च महिन्यात आचारसंहिता लोकसभा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघटनात्क काम वाढवा लक्ष द्या. कारण लोकसभेनंतर चार महिन्यातच विधानसभा लागणार आहेत. या बैठकीला अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह सुनील तटकरे देखील उपस्थित होते.
आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलो की कार्यकर्त्याला हेच वाटते की आम्ही एकच आहोत. कशाला वाईटपणा घ्यायचा असे वाटत असेल तुम्हाला, पण आता आपण पुढे आलो आहोत. कुठेही कसलीही मॅचफिक्सिंग नाही. आता आपल्याला कोणालाही फसवायसे नाहीये. जी भूमिका घेतलीये, त्यात आता कोणताही बदल होणार नाही, हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असे अजित पवार म्हणाले.
मार्च महिन्यात आचारसंहिता लोकसभा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघटनात्क काम वाढवा लक्ष द्या , लोकसभा नंतर लगेच चार महिन्यात विधानसभा आहे. आपण लोकसभेच्या सर्वाधिक सहा- नऊ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आता मागच्या वेळेपेक्षा जास्त जागा आपल्याला जिंकायच्या आहेत, अशा सूचना देखील त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
बोलताना आणि चर्चा करताना महायुती मित्र पक्ष म्हणून नाराज होणार नाही, याची काळची घ्या. कुठमित्र पक्ष चुकत असेल तर आम्हाला सांगा. पण महायुतीत अंतर पडेल किंवा गैरसमज होईल, असे काही वागू नका.
कोणी विचारल तर वरिष्ठ निर्णय घेतील असंच बोला. आगा लावण्याचा प्रयत्न कोणीही करुन नका. कोणी प्रयत्न करत असेल तर वाद वाढवायच्या ऐवजी विझवायचे काम करा,अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत.
‘दबक्या आवाजात चर्चा होतात’
अनेक वेळा वरिष्ठांनी इतर पक्षांशी संधान साधण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येकाचा काम करण्याचा काळ असतो. वयोमाना प्रमाणे नवी पिढी पुढे येत असते. त्यांना मार्गदर्शन करावं लागतं मात्र काही जण ऐकायला तयार नव्हते. काही जण जाणीवपूर्वक सांगतायत की हे कमळावर लढणार आहेत असं काही नाही. आपल्याला गद्दारी , मॅच फिक्सिंग करायची नाही, असे ही अजित पवार म्हणाले.
शेतकऱ्याच्या पैलवान मुलीच्या डोळ्यातून येणारा प्रत्येक अश्रू मोदी सरकारच्या निर्लज्जपणाचा पुरावा
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline
www.mahanayakonline.com
For advertising call now :
9421379055 | 9028150765