जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

#MahanayakOnline | Top News | 14.December.2023 | दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी ;
संसद भवनातील घुसखोरी प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन
केंद्रीय गृह खात्याने संसद भवनातील घुसखोरी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून याकरिता सीआरपीएफ चे महासंचालक अनिश दयाल सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन केली आहे. यामध्ये इतर सुरक्षा संस्था आणि तज्ञ सदस्य देखील आहेत. ही समिती संसदेच्या सुरक्षेच्या त्रुटी ओळखून पुढील कारवाईची शिफारस करणार असून संसदेतील सुरक्षा सुधारण्याचा अहवाल सादर करणार आहे.
संसद घुसखोरी प्रकरणात आठ कर्मचारी निलंबित, ५ जणांना अटक
संसदेत गोंधळ १५ खासदार निलंबित
संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या दरम्यान एकूण 15 खासदारांना अधिवेशन सुरू असेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
दहा महिन्यात महाराष्ट्रात २४७८ शेतकऱ्यांची आत्महत्या
राज्य सरकारने विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याची कबुली दिली आहे. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2023 या दहा महिन्याच्या काळात महाराष्ट्रामध्ये 2478 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठा आरक्षणाबाबत दिलेली मुदत संपण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक
मनोज जरांगे पाटील यांना सरकारने मराठा आरक्षणाबाबत दिलेली मुदत संपण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असून मराठा समाजाला 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण न दिल्यास सरकारला पुढील आंदोलन जड जाईल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. याविषयी सध्या सोशल मीडियावर आंदोलनाची तयारी सुरू झाली असल्याचे पोस्ट पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये 24 तारखेनंतर आरक्षण न मिळाल्यास मुंबईत ट्रॅक्टर मोर्चा धडकणार असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान 24 डिसेंबर नंतरचे आंदोलन कसे असणार याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नसल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले असून 17 डिसेंबरला बैठक बोलवण्यात आली आहे, या बैठकीत पुढील आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या निर्णयामुळे महिलांसोबत भेदभाव होऊ शकतो – स्मृती इराणी
राज्यसभेत राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज कुमारच्या भर पगारी मासिक पाळी रजेबाबत प्रश्न विचारला होता या प्रश्नाला उत्तर देत स्मृती इराणी म्हणाल्या की आज महिला अधिकाधिक आर्थिक संधीचा पर्याय निवडत आहेत हे लक्षात घेऊन मी यावर माझे वैयक्तिक मत देईन,
असे मुद्दे मांडू नये जिथे महिलांना समान संधी नाकारल्या जातात मी स्वतः एक महिला आहे म्हणून मला असे म्हणायचे आहे की मासिक पाळी हा अडथळा नाही हा स्त्रियांच्या जीवन प्रवासाचा एक नैसर्गिक भाग आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये महिलांसोबत भेदभाव होऊ शकतो त्यामुळे मासिक रजेसाठी सध्या कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सांगितले.
मासिक पाळीच्या रजेवर बोलल्या स्मृती इराणी, असे केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये महिलांसोबत होऊ शकतो भेदभाव…
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, तीन महिन्यांत २८,८६८ कोटींची गुंतवणूक
राज्यात विविध उद्योगांद्वारे परकीय गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्राने परत एकदा आघाडीवर आहे. गेल्या तीन महिन्यांत राज्यात एकूण, २८,८८९ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline
www.mahanayakonline.com
For advertising call now :
9421379055 | 9028150765