Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलणार , त्यानंतर ‘या’ नावाने ओळखले जाईल औरंगाबाद विमानतळ…

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : औरंगाबादचे नाव बदलण्यावरून वाद प्रतिवाद चालू असतानाच औरंगाबादच्या विमानतळाचे नाव बदलण्याचा निर्णय मोदी सरकारकडून लवकरच घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे .  देशातील 13 विमानतळांची नावे बदलण्यात येत असून यामध्ये  महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराचाही समावेश आहे. औरंगाबाद विमानतळासह देशातील 13 विमानतळांचे नामांतर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी गुरुवारी दिली असून  त्यावर केंद्र सरकारकडून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे आधीच औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यात यावे यावरून भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिकच रंगण्याची चिन्हे आहेत. 


याबाबत माहिती देताना  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले की,  औरंगाबाद विमानतळाचे नामांतर मराठा राजा छत्रपती संभाजी यांच्या नावाने करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच केंद्राकडे पाठवण्यात आला होता. कराड यांनी हा अचानक घेतलेला निर्णय असल्याचे सांगितले. मी ही एक नियमित प्रक्रिया म्हणून पाहतो. भारतातील किमान 13 विमानतळांचे नाव बदलले जाणार आहे आणि या विमानतळांच्या नवीन नावांवर मंत्रिमंडळ निर्णय घेईल. दरम्यान औरंगाबादेतील एका संस्थेचे डिजिटल प्लॅटफॉर्मवर उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, दिल्लीला जाणाऱ्या लोकप्रतिनिधींनी विमानतळाच्या नामांतराबाबत लक्ष घालून ते बदलून घ्यावे.

Advertisements

यापूर्वी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि इतर अनेक भाजपशासित राज्यांमध्ये अनेक मोठ्या स्थानकांची आणि शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. यामध्ये मध्य प्रदेशातील हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नाव बदलून गोंड राणी कमलापती स्थानक करण्यात आले आहे. पूर्वी पाटलपाणी रेल्वे स्थानकाचे नाव तंट्या मामा रेल्वे स्थानक असे करण्यात आले. यूपीमध्येही अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज करण्यात आले आहे. फैजाबाद जंक्शन स्थानकाचे अयोध्या कॅंट असे नामकरण करण्यात आले आहे. फैजाबाद जिल्ह्याचे नावही बदलून अयोध्या करण्यात आले आहे. आग्रासारखी इतर अनेक शहरांची नावे बदलण्याची मागणीही भाजप नेत्यांनी मांडली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!