Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा वचननामा जाहीर, छत्रपती शिवरायांचे मंदिर, माेफत शिक्षण आणि बरेच काही….

Spread the love

मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने त्यांच्या पक्षाचा वचननामा जाहीर केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर हा वचननामा जाहीर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये हा वचननामा काय आहे ते सांगितले.

’’काही दिवसात महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित हाेईलच पण काही बारीक-सारी गाेष्टी अशा आहेत. ज्या शिवसेनेच्या वचननाम्यात दिल्या आहेत. आम्ही युतीत हाेताे तेव्हाही वचननामा आणला हाेता. तसाच आता महाविकास आघाडीत असतानाही आमचा वचननामा आणला आहे. त्यामुळे आम्ही काहीतरी वेगळी भूमिका घेतली असे मुळीचे नाही असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील काेळीवाडे आणि गावठाण त्यामध्ये काेळी बांधव आले काही गावठाण यांच्याकडे आता सरकारची वाकडी नजर गेलेली आहे. या काेळीवाड्यांच्या क्लस्टर विकास किंवा डेव्हलपमेंट करण्याचे घाट त्यांनी घातलेला आहे. क्लस्टर म्हणजे काय ते सगळे एकत्रित करायचे त्यांना टाॅवर बांधून द्यायचे आणि बाकीची जमीन ही त्यांच्या मित्राला त्याच्या घशात घालायची असा हा एक काळा प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे पहिला प्रथम त्यांनी केलेला जीआर आहे ताे रद्द करू काेळीवाड्यांचे अस्तित्व यांची ओळख हे आम्ही कदापी पुसू देणार नाही. या सर्वांना मान्य हाेईल असाच विकास आम्ही त्या ठिकाणी करू’’ असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

धारावीबाबतचा सरकारचा डाव हाणून पाडणार

धारावीच्या माध्यमातून पूर्ण मुंबईभर एक बकालपणा आणण्याचा सरकारचा डाव आहे. ताे देखील आम्हाला हाणून पाडायचा आहे आणि ताे आम्ही हाणून पाडणार. धारावीमध्ये चार-पाच लाख वस्ती असेल त्यातली अर्धी अधिक हे अपात्र ठरवून मुंबईत इतरत्र ेकून द्यायची दहिसर मिठागर या ठिकाणी पाठवायचे धारावीकरांना धारावी साेडायची नाहीये आणि बाकीच्यांना देखील समजत आहे की, नागरी सुविधांवर ताण पडणार आहे. आत्ताच निविदाप्रमाणे किंवा निविदाबाह्य सवलतीप्रमाणे धारावीचा विकास करण्याचा ठरवले. तर, मुंबईकरांवरती मुंबईच्या नागरी सुविधांवरती माेठा भार पडेल जर कॅल्क्युलेशन केले तर हजाराे एकर जमीन ही आजच आदानींना दिलेली आहे त्याच्यात असे आदेश निघालेले आहेत, सरकारचा हा डाव हाणून पाडू’’ असंही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

वचननाम्यातल्या प्रमुख तरतुदी काय?

1) प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य, देखणे आणि प्रेरणादायी मंदिर उभारणार.
2) 2035 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण हाेणार आहेत. पुढच्या 11 वर्षात महाराष्ट्राचा प्राचीन, मध्यमयुगीन आणि आधुनिक इतिहास तसंच प्रगतीशील आणि पुराेगामी संस्कृतीचं दर्शन घडवणारी लेणी उभारणार.
3) शेतकèयांचे नुकसान हाेवू न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वर्षे स्थिर ठेवणार.
4) महिलांना मिळणारे सरकारी अर्थसहाय्य वाढवणार.
5) प्रत्येक पाेलीस स्टेशन बराेबरीने स्वतंत्र 24द7 महिला पाेलीस ठाणे सुरु करणार.
6) अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या वेतनात वाढ करणार.
7) प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार
8) जात-पात-धर्म-पंथ न पहाता, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुलींप्रमाणे माे\त शिक्षण देणार
9)सरकारी कर्मचाèयांना जुनी पेन्शन याेजना लागू करणार.
10) ’विकेल ते पिकेल’ धाेरणानुसार बळीराजाच्या पीकाला हमखास भाव मिळवून देणार.
11) वंचित समूहांच्या हक्कांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार.
12) धारावीकरांना त्यांच्या उद्याेगांच्या साेयींसह राहतं घर तिथल्या तिथे देणार.
13) मुंबईतील आणि महाराष्ट्रातील भूमीपुत्रांच्या राेजगारासाठी जागतिक दर्जाचे आर्थिक व औद्याेगिक केंद्र उभारणार.
14) बारसू येथील रिायनरी प्रकल्प रद्द करणार. निसर्ग उध्वस्त करणाèया विनाशकारी प्रकल्पांना परवानगी न देता पर्यावरणस्नेही उद्याेगांना प्राेत्साहन देणार.
15) मुंबईतल्या रेसकाेर्सच्या जागेवर कुठलंही अतिरिक्त बांधकाम हाेऊ न देता ती जागा मुंबईकरांसाठीच माेकळी ठेवणार
या प्रमुख तरतुदी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या वचननाम्यात दिल्या आहेत. तसंच महाविकास आघाडीच सरकारच येईल. आम्हाला लाेक काैल देतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!