Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MVANewsUpdate : शिवसेना उद्धव ठाकरे यांची ६५ उमेदवारांची यादी जाहीर

Spread the love

मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांशी झालेल्या चर्चांच्या अनेक फैरी नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या उमेदवार यादीत ६५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गोंधळ सुरू असल्याने मविआतील तीनही प्रमुख पक्षांकडून उमेदवार यादी जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याआधीच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पहिली उमेदवार यादी जाहीर करत ६५ उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. यामध्ये पक्षाच्या विद्यमान आमदारांसह इतर नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसंच अनपेक्षिरीत्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केदार दिघे यांना ठाकरेंकडून मैदानात उतरवण्यात आलं आहे.

यावेळी अनेक नवे चेहरे यंदा ठाकरे गटाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलेत. झीशान सिद्दीकी यांच्या मतदारसंघातून वरुण सरदेसाईंना ठाकरे गटाने मैदानात उतरवलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरु आहे. महाविकास आघाडीच्या प्रचंड काथ्याकूट केल्यानंतर ८५-८५-८५ असा मविआचा फॉर्म्युला ठरला आहे. मविआच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा फॉर्म्युला जाहीर केला. २७० जागांवर आमची पूर्ण सहमती झाली. उरलेल्या जागा ज्या आहेत त्या मित्रपक्षांशी चर्चा करुन, २८८ जागांवर उमेदवार जाहीर करु, असं मविआच्या नेत्यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेला काँग्रेसकडून नाना पटोले, ठाकरेंकडून संजय राऊत आणि राष्ट्रवादी शरद पवारांकडून जयंत पाटील उपस्थित होते.

याबाबत आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

मविआच्या जागावाटपाची माहिती देताना संजय राऊत म्हणाले की, “आम्ही तूर्तास ८५-८५-८५ असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवलेला आहे. आमचे जे अन्य मित्रपक्ष आहेत त्यांना १८ जागा देण्यात येतील आणि उर्वरित जागांबाबत उद्या पुन्हा चर्चा करून निर्णय घेतला जाईल. आमच्या जागावाटपावरून ज्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या त्यांना सांगा की सगळं सुरळीत झालं आहे,” असा टोला राऊत यांनी महायुतीला लगावला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!