Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

संविधानात बदल करण्यासाठी ४०० पार चे बहुमत द्या , भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

Spread the love

कर्नाटक : अबकी बार ४०० पार… बहुमत आल्यास संविधानात बदल करू. संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष शब्द हटवण्यासाठी भाजपा यात दुरुस्ती करेल. त्यासाठी लोकसभेत भाजपा दोन तृतीयांश बहुमत द्या. जेणेकरून देशातील संविधानात बदल करता येऊ शकतो असे वादग्रस्त विधान भाजपाचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी केले आहे.

हेगडे हे कर्नाटकातून सहा वेळा लोकसभा सदस्य राहिले आहेत. एका रॅलीत अनंत कुमार हेगडे म्हणाले की, काँग्रेसने संविधानात अनावश्यक गोष्टी जबरदस्तीने टाकल्या आहेत. विशेष म्हणजे असे कायदे ज्यातून हिंदू समाजाला दाबण्यासाठी केलेत.

हे सर्व बदलायचे आहे. ते बहुमताशिवाय शक्य नाही. आता लोकसभेत काँग्रेस नाही आणि पंतप्रधान मोदींकडे दोन तृतीयांश बहुमत आहे तरीही हे शक्य नाही. कारण संविधानात बदलासाठी लोकसभा, राज्यसभा दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमतासह दोन तृतीयांश राज्यातही विजय आवश्यक असतो असे त्यांनी सांगितले.

तसेच मोदी यांनी अबकी बार ४०० पार घोषणा दिलीय, ती ४०० पार का? कारण लोकसभेत आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. परंतु राज्यसभेत आमच्याकडे बहुमत नाही. राज्य सरकारमध्येही आमच्याकडे आवश्यक बहुमत नाही. जर आगामी लोकसभा निवडणुकीत ४०० जागाहून अधिक जागा मिळाल्या तर राज्यसभेतही बहुमत मिळवण्यासाठी मदत होईल असं खासदार अनंत कुमार हेगडे यांनी म्हटलं.

राहुल गांधींचा निशाणा

भाजपाला ४०० जागा संविधान बदल करण्यासाठी हव्यात. नरेंद्र मोदी आणि संघ परिवाराचा छुपा अजेंडा आता सार्वजनिक झालाय. मोदी आणि भाजपाला बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान संपवायचे आहे. त्यांना न्याय, समानता, नागरी हक्क आणि स्वातंत्र्य यांच्याशी द्वेष आहे.

समाजाचं विभाजन करणे, मीडियाला गुलाम बनवणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे, तपास यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांवर दबाव आणणं, यातून भारताच्या लोकशाहीला हुकुमशाहीत बदलण्याचं त्यांचं धोरण आहे अशा शब्दात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

भाजपाचे स्पष्टीकरण

विरोधकांच्या टीकेनंतर भाजपाने बचावात्मक पवित्रा घेतला आहे. कर्नाटक भाजपाने याबाबत ट्विट करून अनंत कुमार हेगडे यांच्या विधानापासून फारकत घेतली आहे. हेगडे यांचे हे वैयक्तिक मत आहे. त्यांच्याकडून पक्षाने स्पष्टीकरण मागवले आहे. भाजपाने नेहमी संविधानिक लोकहित आणि राष्ट्रीय हितासाठी काम केले आहे असे भाजपा प्रवक्ते गौरव भाटिया यांनी सांगितले.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!