मराठा आंदोलन : संयमाचा अंत पाहू नका, कायद्यापेक्षा कुणीही स्वत:ला मोठे समजू नये – एकनाथ शिंदे

देवेंद्र फडणवीस हे माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. एवढेच नाही तर मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येण्यासाठी निघाले आहेत.
आंतरवाली सराटीत मोठा गोंधळ आणि संताप, मनोज जरांगे आक्रमक, फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे निघाले…
याचपार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला की, मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गंभीर आरोप केले आहेत, तर त्यांना अटक करणार का? या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, संयमाचा अंत पाहू नका. तसेच कायद्यापेक्षा कुणीही स्वत:ला मोठे समजू नये. त्यामुळे आता मराठा आंदोलन मनोज जरांगे यांना अटक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765