शरद पवार गट उगवता सूर्य चिन्ह घेऊन नव्याने सुरुवात करण्याची शक्यता

शरद पवार यांच्या हातून निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हही काढून घेतले आहे. ज्याने पक्षाला जन्म दिला, पक्ष वाढवला, त्यांच्या हातूनच त्यांचा पक्ष काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार गटाने पुन्हा एकदा कंबर कसली असून दिल्लीत वकिलांशी चर्चा सुरू केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. कोर्टात काय मुद्दे मांडायचे, पुरावे काय द्यायचे आणि निवडणूक आयोगाने काय सांगितले यावर दिल्लीत चर्चा सुरू आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत शरद पवार गटाला पक्षाची तीन नवीन नावे आणि चिन्ह द्यायला सांगितली आहेत. त्यामुळे पवार गटाकडून उद्या पक्षाचे नवं नाव आणि चिन्ह सूचवले जाणार आहे.
शरद पवार गट उगवता सूर्य हे चिन्ह घेण्याची शक्यता आहे. हे चिन्ह घेऊन पवार गट राज्यात पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची शक्यता आहे. तर, शरद पवार गट पक्षाचे काय नाव निवडणूक आयोगाला देतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धुळ्यात अजितदादा गटाकडून जल्लोष
पक्षाचे नाव आणि चिन्ह अजितदादा गटाला मिळाल्यानंतर धुळ्यात अजितदादा गटाकडून जल्लोष करण्यात आला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून हा जल्लोष केला आहे. तसेच एकमेकांना पेढे भरवतही आनंद व्यक्त केला आहे.
शहरातील झाशी राणी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आनंद व्यक्त केला आहे. यावेळी एकच वादा अजितदादाच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्राचा बुलंद आवाज अजित पवार, अजित पवार आदी घोषणाही यावेळी देण्यात आल्या आहेत.
निवडणूक आयोगाचा निकाल येताच ठाण्यातही जोरदार जल्लोष करण्यात आला. ठाणे येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडत निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले. राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली. यावेळी एकमेकांना पेढे भरवण्यात आले.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765