झारखंडच्या राजकारणासाठी महत्त्वाचा दिवस, बहुमत चाचणीने ठरणार झारखंड सरकारचे भवितव्य…

झारखंडच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. चंपाई सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र आज चंपाई सोरेन यांना बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. या बहुमत चाचणीवर चंपाई सोरेन यांच्या सरकारचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
या बहुमताच्या चाचणीसाठी हैदराबादमध्ये पाठविलेले आमदार राचीमध्ये दाखल झाले आहेत. झारखंड सरकारच्या या बहुमत चाचणीवर केवळ चंपाई सोरेनच नाही तर विरोधकही लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे झारखंडसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे.
यापूर्वी ईडीने जमीन घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेनला अटक केली होती. 31 जानेवारी रोजी हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर चंपाई सोरेन यांनी २ फेब्रुवारी रोजी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चंपाई सोरेन यांच्या सरकारला आज बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.
सत्ताधारी पक्षाकडे संख्याबळ किती आहे
झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण 81 जागा आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाला 29 आमदारांचा पाठिंबा आहे, काँग्रेसचे 17, आरजेडीचा 1 आणि सीपीआयचा 1 असे एकूण 48 आमदार आहेत.
झारखंडमध्ये बहुमतासाठी ४१ सदस्यांची गरज आहे. या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये बहुमत सिद्ध होत नाही तोपर्यंत सर्व आमदारांना हैदराबादमधील हॉटेलमध्ये पाठवण्यात आले आहे. तसेच विरोधकांकडे 33 आमदारांचे संख्याबळ आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765