Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Assembly Election Results 2023 : प्राथमिक कलानुसार तेलंगणा आणि छत्तीसगडमध्येकॉंग्रेस आघाडीवर, मध्य प्रदेशात रस्सीखेच तर राजस्थानात भाजप पुढे …

Spread the love

तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. तिकडे मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे. तर राजस्थानात भाजपने शतक पार केलं आहे. राजस्थानात एकूण १९९ जागांसाठी मतदान झालं आहे. राजस्थानात भाजप १००, काँग्रेस ८० आणि इतर १९ जागांवर आघाडीवर आहेत.


हैद्राबाद : तेलंगणात सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला मागे सोडत काँग्रेसने प्राथमिक कलांमध्ये आघाडी घेतली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी तेलंगणा निवडणुकीचे निकाल महत्त्वाचे असतील. कर्नाटकमधील विजयानंतर येथील विजयामुळे दक्षिणेत कोन्ग्रेस आणखी मजबूत होईल. हाती आलेल्या माहितीनुसार पहिल्या तासात काँग्रेसने 60 जागांवर आघाडी घेतली आहे. बीआरएस 33 जागांवर आघाडीवर आहे. एमआयएम 6 जागांवर आघाडीवर आहे.

या निवडणुकीत कॉंग्रेसने राज्यातील जनतेला 6 हमीभावाचे आश्वासन देत मतदारांना आकर्षित केले होते. दरम्यान त्यामुळेच जवळपास सर्वच एक्झिट पोलने या राज्यात काँग्रेसच्या बाजूने बहुमताचा अंदाज वर्तवला होता. निकालाचा कल लक्षात घेता मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव 10 वर्षांच्या शासनानंतर आपली पकड गमावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एक्झिट पोलनुसार भाजप आणि एआयएमआयएम एकाच अंकात राहण्याची शक्यता आहे.

काँग्रेसने मुख्यत्वे बीआरएस सरकारच्या कथित भ्रष्टाचारावर लक्ष केंद्रित केले आणि त्याच्या “सहा हमी” आणि राजवटीत “बदल” करण्याची गरज अधोरेखित केली. 30 नोव्हेंबर रोजी झालेल्या 119 सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीत पात्र 3.26 कोटी मतदारांपैकी 71.34 टक्के मतदानाची नोंद झाली, जी काही किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडली.

भाजपच्या मोहिमेमध्ये “डबल इंजिन सरकार”, केसीआरचे “कौटुंबिक शासन” आणि कथित भ्रष्टाचार, याशिवाय एका मागास जातीच्या नेत्याला मुख्यमंत्री बनवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. बीआरएस मोहीम मागील काँग्रेस राजवटीच्या अपयशांवर आणि शेतकरी आणि महिलांसाठी चालू असलेल्या कल्याणकारी उपायांवर केंद्रित होती. राव यांनी तेलंगणा राज्याचा दर्जा मिळवण्यासाठी केलेल्या संघर्षावरही प्रकाश टाकला.

दरम्यान , “बर्‍याच दिवसांनी शांत झोप लागली. एक्झिट पोलमध्ये वाढ होऊ शकते. अचूक मतदान आम्हाला चांगली बातमी देईल,” असे राज्यमंत्री केटीआर यांनी ट्टिट केलं आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत, KCR यांना राज्यातील 119 पैकी 88 जागा जिंकून जबरदस्त जनादेश मिळाला होता. दुसरीकडे काँग्रेसला केवळ 21 जागा जिंकता आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी हैदराबादमध्ये रोड शो व्यतिरिक्त प्रचाराच्या काळात अनेक सभांना संबोधित केले तर केसीआर यांनी 96 रॅलींमध्ये भाषण केले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!