IndiaNewsUpdate : “झी टीव्ही” चे अँकर रोहित रंजन यांना अटक , राहुल गांधींचा व्हिडीओ चुकीच्या संदर्भाने दाखवला…
नवी दिल्ली: झी टीव्हीचा न्यूज अँकर रोहित रंजन याला मंगळवारी नोएडा पोलिसांनी ताब्यात घेतले. चॅनलने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दिशाभूल करणारा व्हिडिओ दाखवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या व्हिडिओबद्दल चॅनलने माफीही मागितली होती.
एका नाट्यमय व्हिडिओमध्ये दोन राज्यांच्या पोलिसांमध्ये जोरदार वादावादी आणि हाणामारी झाली आहे. छत्तीसगड पोलिस अँकरला अटक करण्याचा प्रयत्न करत होते, तर गाझियाबादमध्ये पोलिसांनी अँकरला दुसरीकडे नेले. रोहित रंजन यांनी सीएम योगी आदित्यनाथ, एसएसपी गाझियाबाद आणि एडीजी लखनऊ यांना टॅग करत ट्विट केले कि , ‘छत्तीसगड पोलिस स्थानिक पोलिसांना न कळवता मला अटक करण्यासाठी माझ्या घराबाहेर उभे आहेत, हे कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का?’
यावर छत्तीसगड पोलिसांनी उत्तर दिले की जर वॉरंट असेल तर कोणालाही कळवण्याची गरज नाही. रायपूर पोलिसांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘माहितीचा असा कोणताही नियम नाही. मात्र, आता त्यांना माहिती मिळाली आहे. पोलीस पथकाने तुम्हाला न्यायालयाचे अटक वॉरंट दाखवले. तुम्ही तपासात सहकार्य करावे आणि न्यायालयात आपला बचाव करावा.
दरम्यान छत्तीसगड पोलिसांच्या पथकाने अँकरला अटकेपासून वाचवण्यासाठी गाझियाबाद पोलिसांनी त्यांना सोबत घेतले. सध्या ते यूपी पोलिसांच्या ताब्यात असून, ज्या प्रकरणात त्याला ताब्यात घेण्यात आले आहे त्या प्रकरणात फारशी गंभीर कलमे लावलेली नाहीत हे विशेष.
There is no such rule to inform. Still, now they are informed. Police team has shown you court’s warrant of arrest. You should in fact cooperate, join in investigation and put your defence in court.
— Raipur Police (@RaipurPoliceCG) July 5, 2022
केरळमधील वायनाड येथे त्यांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या तरुणांबाबत राहुल गांधींचे वक्तव्य, उदयपूरच्या शिंपीच्या मारेकऱ्यांवरील राहुल गांधींचे वक्तव्य अँकर रोहित रंजन यांनी विस्कळितपणे दाखविल्याचा आरोप आहे. यानंतर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये अँकरवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हा व्हिडिओ राज्यवर्धन राठोड सारख्या भाजप नेत्यांनी देखील शेअर केला होता, त्यांच्याविरोधात देखील एफआयआर देखील नोंदवण्यात आला आहे.
झी टीव्ही ने मागितली होती माफी…
विशेष म्हणजे वाद होताच या प्रकरणी रंजन आपल्या शोमध्ये म्हणाले होते कि , ‘काल आमच्या शो “डीएनए”मध्ये उदयपूरच्या घटनेशी संबंध जोडून राहुल गांधींचे विधान चुकीच्या संदर्भात घेण्यात आले होते, ही मानवी चूक होती ज्यासाठी आमची टीम माफी मागते.’
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले होते की, ‘ज्या मुलांनी हे कृत्य केले आहे त्यांना माफ करा’ असे सांगताना राहुल गांधी त्यांच्या वायनाड कार्यालयावरील हल्ल्याचा संदर्भ देत होते. गेहलोत म्हणाले, “पण टीव्ही चॅनल आणि अँकरने ज्या प्रकारे व्हिडिओ चालवला, त्यावरून राहुल गांधी म्हणत आहेत की उदयपूरमध्ये कन्हैया लालची हत्या करणारी मुले होती आणि त्यांना माफ केले पाहिजे.”