Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : “अग्निपथ ” : केंद्रीय मंत्र्यांनी मानले ‘पीएम’चे आभार पण ४ वर्षावरुन तरुण आहेत नाराज

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सैन्यात पुनर्स्थापनेसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेला देशव्यापी विरोध होत असताना अनेक केंद्रीय मंत्र्यांनी तरुणांना ही नवीन योजना त्यांच्यासाठी फायदेशीर आहे आणि भविष्यात त्याचा फायदा त्यांना नक्कीच मिळेल हे पटवून देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी याबद्दल पंतप्रधानांचे आभारही मानले आहेत , मात्र अग्निपथ योजनेंतर्गत चार वर्षांसाठी पुन्हा लष्करात भरती करण्याच्या योजनेमुळे तरुणांमध्ये नाराजी आहे. भरती प्रक्रियेत कोणताही बदल करू नये, अशी त्यांची मागणी आहे. याचा तरुणांना फायदा होणार नाही, असे त्यांचे मत आहे.


विशेषत: बिहार आणि यूपीमध्ये संतप्त तरुण गेल्या तीन दिवसांपासून तीव्र आंदोलन करत आहेत. अनेक ठिकाणाहून तोडफोड, जाळपोळ, दगडफेकीच्या बातम्या समोर येत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलकांनी गाड्यांची तोडफोड केली तसेच त्या जाळल्या. याशिवाय रेल्वे मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.

Advertisements

अमित शहा यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

“अग्निपथ”वरून  वाढता गोंधळ पाहून केंद्रीय मंत्र्यांनी तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे केला आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी ट्विट करून म्हटले आहे  की, “गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे सैन्यातील भरती प्रक्रियेवर परिणाम झाला होता, हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अग्निपथ योजने’ सुरु केली आहे . तरुणांचा विरोध लक्षात घेऊन पहिल्या वर्षी  या योजनेत  वयोमर्यादा २१ वर्षावरून २३ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात तरुणांना फायदा होणार असून, तरुणांनी अग्निपथ योजनेच्या माध्यमातून त्यांना देशाच्या सेवेकडे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करावी. यासाठी मी पंतप्रधान मोदींचे आभार व्यक्त करतो.”

Advertisements
Advertisements

राजनाथसिंह यांचेही ट्विट

त्याचवेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट केले की, केंद्र सरकारने जाहीर केलेली ‘अग्निपथ योजना’ ही भारतातील तरुणांना देशाच्या संरक्षण व्यवस्थेत सामील होऊन देशसेवा करण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे देशाचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून तरुणांच्या मनात अग्निवीर होण्यासाठी पात्र व्हा. पंतप्रधानांनी तरुणांच्या भवितव्याबद्दलची काळजी आणि संवेदनशीलता दाखवल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. मी तरुणांना आवाहन करतो की, सैन्यात भरतीची प्रक्रिया काही दिवसांत सुरू होणार आहे. त्यांनी यासाठी तयारी. करावी.

निर्मला सीतारामन म्हणतात…

केंद्रीय अर्थमंत्री अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही यासंदर्भात  ट्विट केले असून त्यात म्हटले आहे कि , “अग्निपथ योजनेत २१ वर्षे वयापर्यंतच्या तरुणांना चार वर्षांच्या कालावधीसाठी देशसेवेची संधी देण्याची कल्पना आहे. या आधारवर त्यांच्या ऐच्छिक प्रतिधारणेसाठीही तरतूद करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात कोरोनामुळे सैन्य भरतीवर परिणाम झाला होता. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी अग्निपथ योजनेसाठी पहिल्या वर्षी २३ वर्षे वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.आमच्या तरुणांच्या आशा-आकांक्षांना संवेदनशील बनवून पंतप्रधानांनी हे पाऊल उचलले आहे.या निर्णयामुळे देशसेवेची संधी गमावलेल्या आमच्या तरुणांना मदतच होणार आहे. या निर्णयाबद्दल पंतप्रधानांचे आम्ही आभारी आहोत.

केंद्राने बदल जाहीर केले

विशेष म्हणजे, केंद्राने गुरुवारी देशव्यापी निषेधाच्या पार्श्वभूमीवर ‘अग्निपथ’ लष्करी भरती योजनेची वयोमर्यादा २१ वरून २३ केली. गेल्या दोन वर्षांत एकही भरती न झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. केंद्र सरकारने सैन्यात भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजना आणली आहे, ज्यामुळे यूपी-बिहारसह देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने होत आहेत.

यामध्ये पहिला बदल गुरुवारी रात्री सरकारने जाहीर केला. यापूर्वी २१ वर्षे वयापर्यंतचे तरुण सहभागी होऊ शकतात, अशी तरतूद होती, मात्र आता ती २३ वर्षे करण्यात आली आहे. मात्र, ही वयोमर्यादा एका वर्षासाठीच वाढवण्यात आली असून एक वर्षानंतर वयोमर्यादा २१ वर्षे राहील.

हैद्राबाद , तेलनगणातही तरुणांचे हिंसक आंदोलन

दरम्यान अग्निपथ योजनेच्या विरोधाची आग आता उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत पोहोचली आहे. तेलंगणामध्ये अग्निपथ योजनेला विरोध करताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. आंदोलकांनी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर तीन गाड्या पेटवून दिल्या, त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. यादरम्यान एका आंदोलकाचा मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाले आहेत.

सिकंदराबाद रेल्वे स्थानकाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एके गुप्ता यांनी सांगितले की, अग्निपथ आंदोलकांनी ट्रेनचे ४-५ इंजिन आणि २-३ डबे पेटवून दिले. आम्ही किती नुकसान झाले याचे विश्लेषण करू. तर एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!