MaharashtraNewsUpdate : अर्णब गोस्वामीसाठी स्वतः राज्यपालांचा गृहमंत्र्यांना फोन तर सुटकेसाठी राम कदम यांचे सिद्धी विनायकाला साकडे

Maharashtra Governor BS Koshyari spoke to State Home Minister Anil Deshmukh & conveyed to him his concern over the security and health of Republic TV Editor Arnab Goswami. He also asked the Home Minister to allow Goswami's family to see him and to speak to him: Raj Bhavan pic.twitter.com/ctTpWdsSIt
— ANI (@ANI) November 9, 2020
अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेल्या अर्णब गोस्वामीसाठी स्वतः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत फोनवरून याबाबत चर्चा केली आहे. अर्नबच्या समर्थनार्थ भाजप रस्त्यावर उतरली असून न्यायालयात अर्णबचा जामीन अर्ज प्रलंबित असतानाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना फोन केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अर्णबच्या अटकेवरून देशाच्या गृहमंत्र्यांनीही हि आणीबाणी आहे आणि लोकशाहीची गळचेपी असल्याचे ट्विट केले होते.
इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामीला गेल्या बुधवारी सकाळी रायगड पोलीस आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत अटक केली होती. या पार्श्वभूमीवर राज्यपलांनी अनिल देशमुख यांच्याकडे अर्णब गोस्वामीची सुरक्षा व आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. गोस्वामी बुधवारी (४ नोव्हेंबर)पासून अटकेत आहे. रविवारी त्याला कोठडीत असताना मोबाइल फोनचा वापरल्यामुळं तळोजा तुरुंगात हलवण्यात आलं आहे. त्यांच्याकडे कोठडीत असताना मोबाइल फोन आला कुठून, कोणी दिला? याची चौकशी आता करण्यात येत आहे. नवी मुंबईतील तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे. त्यामुळं अर्णब गोस्वामीच्या कुटुंबियांना त्याला भेटू देण्याची तसेच त्यांच्याशी बोलण्याची अनुमती द्यावी, अशा सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांनी दिल्या आहेत. यापूर्वीही राज्यपालांनी अनिल देशमुख यांच्याकडे गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरून चिंता व्यक्त केली होती.
अर्णबच्या जमीन अर्जावर शनिवारी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने आरोपींना तातडीने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यामुळं या प्रकरणावर आज (सोमवारी) निर्णय सुनावणार असल्याचं जाहीर केलं आहे. न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांचे खंडपीठ विशेष व्हीसी सुनावणीत निकाल सुनावणार आहेत.
भाजप आमदारांचा इशारा , हिम्मत है तो रोक लो ….
दरम्यान भाजपचे आमदार राम कदम हे अर्णवला भेटण्यासाठी निघाले असून हिंमत असेल तर अडवून दाखवा, असं आव्हान त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारला दिलं आहे. अर्णव गोस्वामीला अटक केल्यापासून भाजपचे नेते सातत्यानं सरकारवर टीकेच्या तोफा डागत आहेत. अर्णवच्या अटकेचा निषेध म्हणून दोन दिवसांपूर्वी त्यांनी मंत्रालयासमोर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राम कदम यांनी धरणे आंदोलन केले. त्यानंतर वांद्रे ते सिद्धिविनायक मंदिर पायी चालत जाऊन अर्णवच्या सुटकेसाठी सिद्धिविनायकाला साकडे घातले. आज ते तळोजा कारागृहात अर्णव गोस्वामीची भेट घेण्यासाठी जाणार आहेत.
राम कदम यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ‘अर्णवच्या जिवाला धोका आहे,’ असा आरोप कदम यांनी केला आहे. ‘अर्णवच्या केसालाही धक्का लागला तर त्यासाठी महाविकास आघाडी सरकार जबाबदार असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना देशातील जनता कधीच माफ करणार नाही. त्यांनी बळजबरीनं राज्यावर आणीबाणी लादली आहे,’ असंही कदम यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ‘अर्णवला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, महाराष्ट्र सरकार बरखास्त करा,’ अशी मागणीही कदम यांनी केली आहे.
#Arnab जी के जान को ख़तरा है . उनके सर के बाल को भी धक्का लगा उसका ज़िम्मेदार #MVA होगी @OfficeofUT @AnilDeshmukhNCP जी आपको देश कीं जनता कभी माफ़ नहीं करेगी आपने जबरन आपातकाल थोपा है . मै निकला हूँ मेरे घरसे #Arnab जी को तलोज़ा जेल में मिलने के लिए . हिम्मत है तो रोक के दिखाओ
— Ram Kadam ( modi ka parivar ) (@ramkadam) November 9, 2020