Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोदी सरकारची पहिली टर्म आणीबाणीपेक्षाही वाईट : ममता बॅनर्जी

Spread the love

देशात मागील पाच वर्षे आणीबाणीपेक्षा वाईट काळ होता असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर आणि मोदींच्या कार्यकाळावर निशाणा साधला. मोदी सरकारची पहिली टर्म म्हणजे आणीबाणीपेक्षा वाईट काळ होता असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. १९७५ या वर्षी आजच्याच दिवशी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. त्याच गोष्टीची आठवण सांगताना ममता बॅनर्जी यांनी देशात आणीबाणीपेक्षा वाईट काळ मागील पाच वर्षे होता असे म्हटले आहे. आपण आपल्या इतिहासातून धडे घेतले पाहिजेत. ज्यामुळे लोकशाहीच्या हितांचे रक्षण करता येणे शक्य होते. ममता बॅनर्जी यांनी यासंदर्भात ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी या कायमच मोदी सरकारविरोधात भूमिका घेतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही ते देशानं पाहिलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!