Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

loksabha 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्ध्यातील भाषणाला निवडणूक आयोगाची ” क्लिन चिट “

Spread the love

भारतीय लष्कराच्या शौर्याच्या नावाने मते मागितल्याच्या आरोपावर अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘क्लीन चिट’ दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील वर्धा येथील जाहीर सभेत केलेल्या भाषणातून कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग झालेला नाही, असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला आहे.पंतप्रधान मोदी यांची १ एप्रिल रोजी वर्धा येथे जाहीर प्रचारसभा झाली होती. या सभेत त्यांनी लष्कराच्या नावाने मते मागून आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार काँग्रेसकडून करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला होता. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निवडणूक आयोगाची आज उच्चस्तरिय बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान मोदींचे भाषण व अहवालाची पडताळणी करण्यात आली. त्या पडताळणीअंती मोदींकडून कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचं उल्लंघन झालेलं नाही, असा निर्वाळा देत आयोगाने ही तक्रार निकाली काढली.

काय म्हणाले होते मोदी?
आपल्या जवानांनी पाकिस्तानात घुसून हवाई हल्ला करत शौर्य गाजवले आणि विरोधी पक्षातले लोक त्याचे पुरावे मागत आहेत. पाकिस्तानला आनंद होईल, अशी भाषा त्यांच्या तोंडी आहे, असा निशाणा मोदींनी वर्धा येथील सभेत साधला होता. देशातील कोट्यवधी जनतेवर हिंदू दहशतवादाचा डाग लावण्याचे काम काँग्रेसने केले आहे. हजारो वर्षांच्या इतिहासात हिंदू दहशतवादाचे उदाहरण कुठे आहे का? आपल्या ५ हजार वर्षांच्या परंपरेवर कलंक लावण्याचा हा प्रकार असून काँग्रेसला तुम्ही माफ करणार का?, असा सवालही मोदींनी या सभेत विचारला होता. त्यावरून मोठे वादळ उठले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!