Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रीय , आपल्या मुलांची काळजी घ्या : जितेंद्र आव्हाडांचे ट्विट

Spread the love

‘महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रीय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीमधील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी’,  ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आज हास्याची लहर येऊन गेली . जितेंद्र आव्हाड यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. महाराष्ट्राच्या विधान सभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डॉ. सुजय विखे-पाटील यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्विट करून भाजपला चांगलाच चिंता काढला. हे ट्विट करताना त्यांनी  भाजपचे किंवा सुजय-विखे पाटील यांच्या नावाचा कोणताही उल्लेख कले नाही. असे असले तरी सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर हे ट्विट करण्यात आल्याने त्याचा संबंध जोडला जात आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीला पेचात टाकणाऱ्या सुजय विखे पाटील यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यानंतर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी हे ट्विट केले. या ट्विट आधी त्यांनी आणखी एक ट्विट करून आप-आपसातले वाद तुम्हाला कसे संपवू शकतात, याचे उत्तम वास्तविक उदाहरण, असे म्हणत एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओत दोन प्राणी भांडताना दिसत असून पाठीमागून वाघ येतो व एकाची शिकार करतो, हे या व्हिडिओत दिसत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!