Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : शेतकरी आंदोलन : अमेरिकन खासदारांचे पराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांना पत्र , भारतासमोर मुद्दा उपस्थित करण्याची मागणी

Spread the love

मोदी सरकारने केलेल्या नव्या कायद्यांच्या विरोधात मागील महिनाभरापासून शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला अमेरिकेतील खासदारांनी पाठिंबा दिला आहे . याबात त्यांनी पराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांना पत्र लिहीले असून त्यात अमेरिकेने या आंदोलनाचा मुद्दा भारतासमोर उपस्थित करण्याची मागणी केली आहे.

भारतीय वंशाच्या खासदार प्रमिला जयपाल यांच्यासह सात खासदारांनी हे पत्र लिहीले आहे. माइक पॉम्पिओ यांना २३ डिसेंबर रोजी लिहीलेल्या पत्रात त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या आंदोलनात पंजाबमधील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उतरले आहेत. पंजाबशी निगडीत असल्यामुळे अनेक अमेरिकन शीख नागरिकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. त्याशिवाय इतर भारतीय वंशाच्या नागरिकांमध्ये या आंदोलनामुळे चिंतेचे वातावरण असल्याचे पत्रात म्हटले गेले आहे. भारतीय वंशाच्या नागरिकांवर या आंदोलनाचा परिणाम होत आहे. अनेकांचे कुटुंबीय, मूळ भूमी पंजाबमधील आहे. त्यामुळे आपले कुटुंबीय, नातेवाईकांची चिंता अमेरिकन-भारतीयांना सतावत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. राजकीय अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असावे यासाठी अमेरिका प्रयत्नशील असल्याचे सांगत भारतीय परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करण्याची मागणी अमेरिकन खासदारांनी माइक पॉम्पिओ यांच्याकडे केली आहे.

या पत्रात नमूद करण्यात आले आहे कि , भारत सरकारला आपल्या देशाच्या हितांच्या अनुषंगाने धोरण आखण्याचा अधिकार असून त्याचा आम्ही आदर करत आहोत. मात्र,परदेशात असलेल्या नागरिकांच्या अधिकारांना आम्ही मानत असून त्यांच्याकडून कृषी कायद्यांना विरोध केला जात आहे. हा कृषी कायदा घातक असल्याचा दावा करत भारतीय शेतकरी आंदोलन करत असल्याचे पत्रात नमदू करण्यात आले आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन खासदार प्रमिला जयपाल, डोनाल्ड नोरक्रॉस, ब्रेनडॉन एफ. बॉयल, ब्रायन फिट्जपॅट्रिक, मेरी गे स्कानलोन, डेबी डिंगेल आणि डेविड ट्रोन यांनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.

या पूर्वीही  अमेरिकेतील काही खासदारांनी शेतकरी आंदोलनाच्या बाजूने भूमिका घेत पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध केला होता. त्याशिवाय कॅनडा, ब्रिटनमधील खासदारांनी भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. त्यावर शेतकरी आंदोलन हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे भारताने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले की, आम्ही भारतात शेतकऱ्यांशी संबंधित काही टिप्पणी पाहिल्या असून त्या संपूर्णपणे चुकीच्या माहितीच्या आधारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारची मागणी, वक्तव्ये करणे हे चुकीचे आहे. लोकशाही असलेल्या भारतासारख्या देशातला हा अंतर्गत मुद्दा असल्याचे त्यांनी म्हटले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!