Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आज एक मशीद पाडली, उद्या दुसरी पाडतील, कोल्हापूरला जाण्यावर इम्तियाज जलील ठाम

Advertisements
Advertisements
Spread the love

छत्रपती संभाजीनगर : विशाळगड हिंसाचार प्रकरणावर इम्तियाज जलील यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून त्यांनी संभाजीराजेंवरही टीका केली आहे. याबाबत पोलिसांनी जबाबदारी पार पाडली असती तर हे झाले नसते, आज एक मशीद पाडली, उद्या दुसरी पाडतील, असे वक्तव्य करीत सर्व हिंदुत्वादी संघटनाना मी तिकडे नको आहे. कोल्हापूर तुमच्या बापाची जहागीर नाही. मी १०० टक्के कोल्हापूर जाण्याबाबत निर्णय घेणार आहे, अशा भाषेत संभाजीराजेंनी सांगितलं आहे.

ते म्हणाले की, आज खुले आम मशिदीची तोडफोड केली जात आहे. याचा अतिक्रमणाची सबंध नाही. याबाबत जर पोलिसांनी जबाबदारी पार पाडली असती तर असं झालं नसतं. आज एक मशीद पाडली, उद्या दुसरी पाडतील. राज्यात काँग्रेस असो राष्ट्रवादी आणि सेक्युलर पक्षाचे कोणते नॉन मुस्लिम लोक याबाबत निवेदन देत आहेत. माझ्या घरावर हल्ला सहन करेल, पण मशिदी वर नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Advertisements

ते म्हणाले की, कोणी कोणी तोडफोड केली यावर कारवाई करावी. संभाजी महाराज या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. शाहू महाराजांचे वंशज माननारे स्वतःच्या नावापुढे छत्रपती लावणारे अशा हिंसक आंदोलन करणार का? तुम्हाला एकदा शाहू महाराजांचे पुस्तक पाठवतो ते एकदा वाचा. त्यांचा मुलगा तोडफोड करतो आणि वडील म्हणतात शांतता राखा असं म्हणतात. संभाजीनगर मधील किराडपुऱ्यात राम मंदिरावर हल्ला होत होता, तेव्हा त्या ठिकाणी कोणता मर्द आला नव्हता. त्या ठिकाणी एकटा इम्तियाज जलील आला होता. विधानसभेची निवडणूक आली म्हणून तुम्हाला दर्गा आठवतो, असं म्हणत त्यांनी संभाजीराजेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान अजित पवार यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात भेट दिली. १४ जुलै रोजी झालेल्या हिंसाचारात या गावातील जिथे अतिक्रमणाचा काहीही संबंध नाही, अशा मुसलमानवाडी येथील अनेक घरांचे मोठं नुकसान झालं होतं. यानंतर प्रशासनाच्या वतीने विशाळगडावर जिथे अतिक्रमण आहे. तेथील अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात १०० हून अधिक अतिक्रमण काढण्यात आले असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विशाळगडावर ज्यांनी अतिक्रमण केले आहे, अशा घरातील महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. तसेच कारवाई करू नये, असे विनंतीही त्यांनी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!