IndiaNewsUpdate : कृषी कायदे रद्द झाले तरी विरोधकांची टीका सुरूच , राहुल गांधींनी विचारले सरकारला हे प्रश्न

नवी दिल्ली : अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोशोत केल्याप्रमाणे तिन्हीही वादग्रस्त कृषी कायदे राष्ट्रपतींच्या सहीने रद्द झाले असले तरी विरोधी पक्षाकडून मोदी सरकारवर टीका चालूच आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधताना कृषी विरोधी कायदा केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली, पण आता ते प्रायश्चित कसं करणार ?, असा सवाल राहुल गांधींनी केला आहे.
दरम्यान राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘पंतप्रधानांनी कृषी विरोधी कायदे बनवल्याबद्दल माफी मागितली, आता प्रायश्चित कसे करणार हे संसदेत सांगावे? त्याचबरोबर लखीमपूर प्रकरणातील मंत्र्याला कधी हटवणार? शहीद शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळणार? आंदोलकांवरील खोटे खटले कधी परत घेणार? एमएसपीवर कायदा कधी करणार? त्याशिवाय माफी अपूर्णच!’ .
जब PM ने कृषि-विरोधी क़ानून बनाने के लिए माफ़ी माँगी तो संसद में बतायें कि
प्रायश्चित कैसे करेंगे-लखीमपुर मामले के मंत्री को बर्खास्त कब?
शहीद किसानों को मुआवज़ा कितना-कब?
सत्याग्रहियों के ख़िलाफ़ झूठे केस वापस कब?
MSP पर क़ानून कब?इसके बिना माफ़ी अधूरी! #FarmLaws
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 3, 2021
याशिवाय शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी शेतकरी संघटना आणि विरोधक सातत्याने सरकारकडे करत आहेत. मात्र सरकारकडे असा काही डेटा आहे का, ज्यामध्ये पीडित कुटुंबांचा उल्लेख असेल किंवा त्यांना मदत करण्याचा काही प्रस्ताव असेल ? असा प्रश्न विरोधकांनी सरकारला विचारला होता. यावर कृषी मंत्री नरेंद्र तोमर म्हणाले की, कृषी मंत्रालयाकडे मृत्यूची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे नुकसान भरपाईचा प्रश्नच उद्भवत नाही.