MaharashtraElectionUpdate : मोठी बातमी : निवडणूक घोषित झाली , आता मतदारांची वेळ आली !! जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर ….

नवी दिल्ली : अखेर महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या उपस्थितीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक तारखांची घोषणा केल्याने आजपासून राज्यात आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे.
आज आयोजित पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रमाविषयी केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार ,
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस २९ ऑक्टोबर,
३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छानणी .
४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत
राजीव कुमार यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे:
– महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार असून राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. यामध्ये २३४ सर्वसाधारण मतदारसंघ असून २५ मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी तर २९ मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.
-विधानसभा निवडणुकीत तुतारी चिन्हाला बंदी नाही, निवडणूक आयोगाची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून आलेल्या मागणीनुसार तुतारी वाजवणारा माणूस लहान आणि अस्पष्ट दिसतो तर त्याचा आकार वाढवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. ती मागणी आयोगाने मान्य केली असून आता तुतारी वाजवणारा माणूस स्पष्टपणे मोठा दिसेल. असे सांगण्यात आले आहे. पिपाणीला मात्र बंदी घालण्यात आलेली नाही.
– मतदार हेल्पलाइनच्या आधारे मतदार आपल्या मतदान केंद्रासह इतर माहिती मिळवू शकतात.
– मतदान केंद्रांवर मतदारसंघांसाठी पाण्यासह विविध सुविधा उपलब्ध केल्या जातील.
– निवडणूक काळात पैशांचा गैरवापर होऊ नये, यासाठी विविध ठिकाणी पथकाद्वारे तपासणी केली जाईल.
– ज्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यांना आपल्याबाबत तीनदा वृत्तपत्रांतून माहिती द्यावी लागेल.
दरम्यान, राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांमध्ये पडलेल्या फुटीनंतर होत असलेली ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. तसंच महायुती आणि महाविकास आघाडी या नावांनीतयारी झालेल्या नव्या राजकीय समीकरणांचाही या निवडणुकीत कस लागणार आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार असून यामध्ये कोण बाजी मारणार, याबाबत देशभरात उत्सुकता आहे.
राज्यातील 288 मतदारसंघात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून याच महिन्यात 29 ऑक्टोबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. म्हणजे, 15 दिवसांतच उमेदवारांना अर्ज भरण्याची तयारी करावी लागणार आहे. त्यातच, काही दिवसांपूर्वी नांदेड लोकसभा मतदारसंघातील खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं होतं. त्यामुळे, येथील मतदारसंघात लोकसभा पोटनिवडणुकीचीही घोषण करण्यात आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांप्रमाणेच लोकसभा पोटनिवडणुकांचंही वेळापत्रक असणार आहे. त्यानुसार, 20 नोव्हेंबर रोजी मतदान व 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होईल.
महाराष्ट्र : निवडणुकांचं सविस्तर वेळापत्रक
विधानसभा….
निवडणुकीचं नोटिफिकेशन – 22 ऑक्टोबर 2024
अर्ज भरण्याची तारीख – 29 ऑक्टोबर
अर्ज माघार घेण्याची तारीख – 4 नोव्हेंबर
मतदानाची तारीख – 20 नोव्हेंबर
मतमोजणी – 23 नोव्हेंबर
निवडणूक प्रक्रिया समाप्त – 25 नोव्हेंबर 2024
नांदेड : लोकसभा पोटनिवडणूक
अर्ज भरण्याची तारीख – 29 ऑक्टोबर
अर्ज माघार घेण्याची तारीख – 4 नोव्हेंबर
मतदानाची तारीख – 20 नोव्हेंबर
मतमोजणी – 23 नोव्हेंबर
झारखंड विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात
पहिला टप्पा 43
नोटिफिकेशन 18 ऑक्टोबर
अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 25 ऑक्टोबर
अर्जांची छाननी 28 ऑक्टोबर
अर्ज मागं घेण्याची तारीख 30 ऑक्टोबर
पहिला टप्पा मतदान 13 नोव्हेंबर
दुसरा टप्पा 38 जागा
निवडणुकीचं नोटिफिकेशन: 22 ऑक्टोबर 2024
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर
अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
मतदान : 20 नोव्हेंबर 2024
मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024
निवडणूक प्रक्रिया समाप्त: 25 नोव्हेंबर 2024
राज्यातील मतदारांची संख्या
निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. 9.63 कोटी मतदार असून 4.97 कोटी पुरुष मतदार तर 4.66 कोटी महिला मतदार आहेत. त्यामध्ये, 1.85 कोटी तरुण मतदार आहेत, यंदा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवयुवकांची संख्या म्हणजे नव मतदार 19.48 लाख एवढे आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून 10.77 लाख मतदार आहेत. राज्यात 100 वर्ष पूर्ण करणारे मतदार 47,776 आहेत. तर, 85 वर्षापेक्षा अधिक वय 42 लाख 43 हजार, तर 6.36 लाख दिव्यांग आणि 6,031 तृतीयपंथी मतदार आहेत.
राज्यांत एकूण मतदान केंद्र 1 लाख 186 असणार आहेत.
शहरातील मतदान बुथ केंद्रांची संख्या 42,602 तर ग्रामीण भागात 57,582 बुथ केंद्र असणार आहेत. एका केंद्रावर मतदान 960, दिव्यांग सुविधा 299, महिला अधिकाऱ्यांमार्फत चालवलं जाणारी केंद्र मतदान केंद्र 388, तर मॉडेल मतदान केंद्र 530 असणार आहेत.
मतदारांसाठी सुविधा पोर्टल अॅप
निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने अॅप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणीं काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणुक आयोगाची टीम तिथं पोहचेल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
एटीएमसाठी पैसे घेऊन जाणाऱ्या वाहनांवर निर्बंध
एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणूक काळात रात्री 6 ते सकाळी 8 पर्यंत पैसे वाहतूक करता येणार नाही. राज्यातील पैसा, ड्रग्ज आणि दारुच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात येईल. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावर देखील लक्ष ठेवलं जाईल. 17 सी कॉपी पोलिंग एजंटला मतदान संपताच दिले जातील. यावर किती मतदान झालं याची माहिती असेल. सोशल मीडियात फेक, डीफ फेक प्रकार घडला तर कडक कारवाई होईल.