Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RahulGandhiNewsUpdate : राहुल गांधींच्या कार्यक्रमात ‘खलिस्तान झिंदाबाद’चे नारे, मोदी आणि राहुल गांधी यांना दहशतवाद्यांची धमकी…

Spread the love

सॅन फ्रान्सिस्को : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करत असताना सभागृहात बसलेल्या खलिस्तानी समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यांनी हवेत खलिस्तानी झेंडे फडकावले आणि ‘खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी हसले आणि म्हणाले, ‘नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान’. दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींना धमकी देणारा व्हिडिओ जारी केला आहे.तथापि, खलिस्तान्यांच्या घोषणाबाजीनंतर तेथे उपस्थित भारतीय जनसमुदायाने प्रत्युत्तरात नफरत छोडो, भारत जोडो अशा घोषणा दिल्या.

या घटनेनंतर सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वाँटेड असलेला ‘सिख फॉर जस्टिस’चा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू हा राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकावताना दिसत आहेत. अमेरिकेत राहणारा मोस्ट वाँटेड खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू व्हिडिओमध्ये म्हणतो की, राहुल गांधी अमेरिकेत जिथे जातील तिथे त्यांच्यासमोर खलिस्तानी उभे राहतील. त्याने म्हटले की, 22 जूनला पुढचा नंबर मोदींचा आहे.

राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय प्रवासींच्या मेळाव्याला संबोधित करताना, भारतातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर लोकांना ‘धमकावणे’ आणि देशाच्या एजन्सीचा ‘दुरुपयोग’ केल्याचा आरोप केला. मंगळवारी कॅलिफोर्नियातील सांता क्लारा येथे एका कार्यक्रमात गांधी म्हणाले की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) भारतातील राजकारणाच्या सर्व माध्यमांवर नियंत्रण ठेवत आहेत. ते म्हणाले की, त्यांची ‘भारत जोडो यात्रा’ सुरू करण्यापूर्वी, राजकारणातील जुनी जीवनशैली आता चालत नाही, याची जाणीव झाली.

‘भाजप-आरएसएसचे सर्व यंत्रणांवर नियंत्रण’

राहुल गांधी म्हणाले, ‘भाजप लोकांना धमकावत आहे आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत आहे. ‘भारत जोडो यात्रा’ सुरू करण्यात आली कारण भाजप-आरएसएसने लोकांशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व माध्यमांवर नियंत्रण ठेवले. “राजकीयदृष्ट्या काम करणे खूप अवघड झाले आहे, हेही आम्हाला जाणवत होते. म्हणून आम्ही भारताच्या दक्षिणेकडील टोकापासून श्रीनगरपर्यंत कूच करण्याचे ठरवले. ही यात्रा स्नेह, आदर आणि नम्रतेच्या भावनेने पार पडल्याचे गांधी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!