MaharashtraNewsUpdate : जोपर्यंत चीनवर अवलंबून राहू, तोपर्यंत चीनसमोर झुकावे लागेल

मुंबई : आपण इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर करतो. मात्र मुळात हे भारतातले नाही. आपण कितीही चीनबद्दल ओरडत राहू, मात्र आपल्या फोनमधील ज्या वस्तू आहेत त्या चीनमधून येतात. जोपर्यंत आपण चीनवर अवलंबून राहू, तोपर्यंत चीनसमोर झुकावे लागेल, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे.
भरताच्या ७५ व्य स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते मुंबईतील आयईएस राजा शाळेत ध्वज फडकवण्यात आला. यावेळी त्यांनी भारताच्या आर्थिक स्वातंत्र्याबाबत मत मांडले. तसेच चीनवर अवलंबून असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
या वेळी बोलताना भागवत पुढे म्हणाले कि , कोणत्याही परकीय आक्रमकाचे पाय आपल्या भूमीवर पडले की संघर्ष सुरु व्हायचा. आक्रमकांनी आपल्या देशावर अनेक वेळा हल्ला केला. आपण १५ ऑगस्टला त्याला पूर्णविराम दिला आहे. लढाई लढणारे महान पुरुष आपल्याला प्रेरणा देतात. त्यांची आठवण करण्याची ही वेळ आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर आपण आपले जीवन जगण्यास मोकळे झालो .