CoronaAurangabadUpdate : शाब्बास औरंगाबाद प्रशासन !! शहरात निघाले फक्त १५ नवे कोरोनाबाधित !!

जिल्ह्यात 139394 कोरोनामुक्त, 1856 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद : औरंगाबाद प्रशासनाने राज्यात ऐतिहासिक कामगिरी केली असून राज्यात सर्वाधिक कमी रुग्ण आज औरंगाबाद जिल्ह्यात आढळून आले आहेत. जिल्ह्यात आज 178 जणांना (मनपा 77, ग्रामीण 101) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 139394 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 95 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 144581 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3331 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1856 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (15)
औरंगाबाद 1, घाटी 1, जालान नगर 1, नक्षत्रवाडी 2, उल्कानगरी 1, पैठण गेट 1, जयभवानी नगर 1, अन्य 7
ग्रामीण (80)
बजाज नगर 2, तिसगाव 1, कमलापूर 1, करोडी 1, पैठण 1, करमाड 1, शिरसमाळ ता.औरंगाबाद 1, अन्य 72