गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटली 15 ते 20 जण बेपत्ता

One person dead and seven people missing after a boat capsized in Naugachhia area of Bhagalpur earlier today. Rescue & search operation underway by State Disaster Response Force (SDRF) teams, 9 people have been rescued so far: District Magistrate, Bhagalpur. #Bihar https://t.co/iRA1IENCCL pic.twitter.com/dIJRYL5i9e
— ANI (@ANI) November 5, 2020
बिहारमध्ये भागलपूर परिसरात गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 15 जण बेपत्ता झाले असून काही जण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे.
भागलपूर येथील गोपालपूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या तीनटंगा जहाज घाटाजवळ ही दुर्घटना घडली आहे. या घाटावर काही मजूर आणि शेतकरी हे एका खासगी बोटीने शेतावर काम करण्यासाठी चालले होते. या बोटीवर 50 पेक्षा जास्त लोकं स्वार होती. बोटीत मर्यादेपेक्षा जास्त लोकं असल्यामुळे या बोट दुर्घटनाग्रस्त झाली असल्याचे वृत्त आहे. बोट बुडल्यानंतर स्थानिकांनी धाव घेऊन 30 लोकांना वाचवले आहे. यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून, आतापर्यंत 15 ते 20 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळावर पोलीस, अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे.
दरम्यान बोट बूडत असताना काही जणांनी नदीत उडी मारून आपला जीव वाचवला तर काही जणांना स्थानिक मच्छीमारांनी वाचवले आहे. तसेच जखमी लोकांना गोपालपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजूनही अनेक जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.