MarathaReservation : राज्यातील मराठा आरक्षणासाठी देशाची घटना बदलण्याचा अभ्यास करताहेत खा. संभाजीराजे

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी भाजप पुरस्कृत खासदार देशाची राज्य घटना बदलण्यासंबंधी अभ्यास करीत असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाजाला अडचणींचा सामना करावा लागतो आहे. दरम्यान मराठा आरक्षण हा मुख्यत्वे ठाकरे सरकारचा विषय आहे असेही संभाजी राजे मानतात. यामध्ये केंद्र सरकारची मदत लागली आणि घटना बदलण्याचाही विषय असेल तर त्याबाबतही माझा अभ्यास सुरु आहे , असे खासदार संभाजीराजेंनी म्हटलं आहे. पंढरपूरच्या महापुरानंतरच्या परिस्थितीची पाहणी नंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
खा . संभाजी राजे पुढे म्हणाले कि , मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे. आपण एसीबीसी हा कायदा तयार केला आहे. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं मागासवर्गीय आयोगने म्हटलं आहे त्यामुळे ते सिद्ध झालं आहे. दरम्यान विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या कायद्याला मंजुरी दिली आहे. तो पारित झाला असून हायकोर्टानेही त्याला मान्यता दिली आहे. तरीही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर केंद्र सरकारची काही मुव्हमेंट असेल उदा. घटना बदल करायची असेल तर त्या दृष्टीनेही माझा अभ्यास सुरु आहे. घटना बदल केल्यास तो विषय देशासाठीच लागू होईल” असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बोलताना ते म्हणाले कि , राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी राज्य सरकारने तातडीने मदत करावी. मी छत्रपती या नात्याने रयतेसाठी राज्य आणि केंद्र सरकारशी समन्वय साधणार आहे, मात्र मदत मिळाली पाहिजे. आरक्षणाचा विषय दोन्ही छत्रपतींनी केंद्र सरकारकडून सोडवून घ्यावा असा सल्ला शरद पवारांनी दिला होता. याबाबत भाष्य करण्याचे मात्र संभाजीराजेंनी टाळले.