#CoronaVirusUpdate : राज्यातील कोरोना बाधितांची संख्या २६ हजारावर जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील संख्या….

दिवसभरात आज राज्यात कोरोनाने ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १४९५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण बाधितांची संख्या २५, ९२२ वर पोहोचली आहे. तर एकूण मृतांचा आकडा ९७५ झाला आहे. आतापर्यंत ५५४७ कोरोनाबाधित बरे झाले असून, त्यांना रुग्णालयांतून सोडण्यात आले आहे. मुंबईतही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. बाधितांची संख्या १५७४७ झाली असून, आतापर्यंत ५९६ रुग्ण दगावले आहेत. दरम्यान राज्यात आज ४२२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ५५४७ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ३० हजार ८५७ नमुन्यांपैकी २ लाख ०३ हजार ४३९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत. तर २५ हजार ९२२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९८ हजार २१३ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १४ हजार ६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यभरात आज ५४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण संख्या ९७५ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील ४०, पुण्यात ६, जळगावमध्ये २, सोलापूर शहरात २, औरंगाबाद शहरात २, वसई-विरारमध्ये १, तर रत्नागिरीमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ३३ पुरुष तर २१ महिला आहेत. आज झालेल्या ५४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २९ रुग्ण आहेत. तर २१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहेत. या ५४ रुग्णांपैकी ३६ जणांमध्ये ( ६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.