Budget 2019 Live: याच वर्षी अर्थव्यवस्था होणार तीन लाख कोटी रूपयांची, ‘५ लाखांपुढे उत्पन्न असणाऱ्यांनाच कर’

**EDS: VIDEO GRAB** New Delhi: Finance Minister Nirmala Sitharaman speaks in the Lok Sabha during the Budget Session of Parliament, in New Delhi, Thursday, July 4, 2019. (LSTV/PTI Photo)(PTI7_4_2019_000037B)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात झाली आहे. या अर्थसंकल्पात काय काय तरतुदी असणार? शेतकऱ्यांसाठी काय घोषणा केल्या जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काही वेळापूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात काय काय तरतुदी असणार? करदात्यांना काय काय सवलती दिल्या जाणार? याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
देशाचे बजेट सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी लोकसभा सभागृहात अर्थसंकल्प सादर करताना सुरुवतालीच हिंदीत शेर ऐकवला. भारतीय अर्थव्यवस्थेतेतील सकारात्मक बदल आणि देशाचा आर्थिक विकास याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सितारमण यांनी सभागृहात भाषणाला सुरुवात केली. त्यावेळी, ”यकीन हो तो कोई रास्ता निकलता है, हवा की ओट लेकर भी चिराग जलता है”, असे म्हणत अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात केली.
पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर १ रुपयाची वाढ
डिजिटल पेमेंटचा भार बँकांवर ग्राहकांसाठी मोफत व्यवहार
वार्षिक २ कोटींहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांच्या ३ टक्के तर ५ कोटींहून अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना ७ टक्के अधिभार भरावा लागणार
संरक्षण उत्पादनांच्या आयातीवरील सीमा शुल्क हटवले
१ कोटींहून अधिक रोख रक्कम काढणाऱ्यांना २ टक्के कर भरावा लागणार
पाच लाखांवरील वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकर लागू, कर रचनेत कुठलाही बदल नाही
विदेशी पुस्तकांवर ५ टक्के सीमा शुल्क भरावे लागणार
सोने-चांदीवरील सीमा शुल्कात १० टक्क्यांवरून १२.५ टक्क्यांपर्यंत वाढ
सर्व करदात्यांचे, जबाबदार नागरिकांचे आभार- सीतारामन
१, २, ५ रुपये, १० रुपये आणि २० रुपयांची नाणी येणार
2019-20 मध्ये 4 नवे दूतवास सुरू करणार
एअर इंडियाच्या विलीनीकरणाची मोठी घोषणा
२०२२ पर्यंत प्रत्येकाला घर
१ लाख कोटींनी एनपीए कमी झाला
राष्ट्रीय बँकांना 70 हजार कोटींची मदत
खेलो इंडियाच्या अंतर्गत नॅशनल स्पोर्ट्स एज्युकेशन बोर्डची स्थापना करणार
अनिवासी भारतीयांना आधार कार्ड देणार; त्यांना 180 दिवस वाट बघावी लागणार नाही
35 कोटी एलईडी बल्बचं वाटप
स्टार्ट अप इंडियासाठी टीव्ही चॅनल सुरू करणार
ग्रामसडक योजनेसाठी ८० हजार कोटींची तरतूद
विविध क्षेत्रातली परकिय गुंतवणूक वाढवणार
३ कोटी उद्योजकांना पेन्शन दिलं जाणार
जागतिक दर्जाची 17 पर्यटनस्थळं विकसित करणा