Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Madras High Court : “होय, न्याय व्यवस्थाही भ्रष्ट आहे आणि लोकप्रतिनिधींची निवडही भ्रष्ट पद्धतीनेच होते” !!

Spread the love

भ्रष्टाचारामुळे लोकशाहीच्या तत्वांनाच धक्का पोहोचला आहे, असे मत मद्रास न्यायालयाने व्यक्त केले आहे . देशात सर्वाधिक भ्रष्टाचार निवडणुकांच्या काळात होतो. निवडणुकांमधून लोकप्रतिनिधी निवडून येतात. जर लोकप्रतिनिधींची निवडच भ्रष्ट पद्धतीने होत असेल तर हे देशाच्या लोकशाही मूल्यांना आणि तत्वांना धक्का पोहोचत आहे, असं सांगतानाच होय, न्यायव्यवस्थाही भ्रष्ट आहे, असं कोर्टाने म्हटले आहे.

न्यायव्यवस्थाही भ्रष्टाचाराने आतून-बाहेरून पोखरलेली आहे. ही व्यवस्था सुधारण्यासाठी पावलं उचलायला हवीत असं स्पष्ट मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. तसंच प्रशासनातील भ्रष्टाचार संपणं गरजेचं असल्याचं मतही उच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे.

पी. सर्वानन या व्हिलेज अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर( व्हिएओ)ला काही दिवसांपूर्वी लाच घेतल्यामुळे सस्पेंड करण्यात आले होते. त्याविरोधात त्याने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने सर्वाननची याचिका फेटाळली. पण यावेळी देशाच्या प्रशासनाला आणि न्यायव्यवस्थेला अंतर्बाह्य पोखरणाऱ्या भ्रष्टाचारावर ताशेरे ओढले आहेत.

आज शासन व्यवस्था पूर्णपणे भ्रष्टाचाराने पोखरली आहे. लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही गरिबांना लाच द्यावी लागते. शिष्यवृत्तीचे पैसे मिळवण्यासाठीही भ्रष्टाचार करावा लागतो. देशातील एकही जागा अशी उरलेली नाही जिथे भ्रष्टाचार उरलेला नाही. मृतदेहाचं दफन करण्यासाठीही लाच द्यावी लागते आहे आणि न्याय मिळवण्यासाठीही भ्रष्टाचार करावा लागतो, अशी खंत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केली.

जे कोणी भ्रष्टाचार करत आहेत ते सर्व राष्ट्रविरोधी आहेत, असं परखड मत न्यायालयाने व्यक्त केलं.’जर दहशतवादाला आपण राष्ट्रविरोधी मानत असू तर भ्रष्टाचाराला का नाही? दोन्ही या देशाच्या व्यवस्थेला सारखेच घातक आहे. जे जे भ्रष्टाचार करतात त्या सर्वांना देशविरोधी जाहीर करायला हवं’, असं सांगतानाच भ्रष्टाचार थांबवण्यासाठी उपाय योजना राबवा, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!