MaharashtraCoronaUpdate : राज्यात पुन्हा उच्चांक ५७ हजार ७४ नवे रुग्ण तर २२२ जण दगावले
मुंबई : राज्यात करोनाचा उद्रेक वाढतच असून गेल्या २४ तासात पुन्हा रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला आहे. आज ५७ हजार ७४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून दिवसभरात २२२ जण दगावले आहेत तर २७ हजार ५०८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दरम्यान, राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून ४ लाख ३० हजार ५०३ इतकी झाली आहे.
दरम्यान कोरोना लसीकरणात महाराष्ट्राने रेकॉर्डब्रेक कामगिरी करूनही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने आरोग्य यंत्रणा आणि सरकारचीही झोप उडाली आहे. आजची आकडेवारी हाती आलेली आकडेवारी तर धडकी भरवणारी आहे. राज्यात आज ५७ हजार ७४ नवीन रुग्णांची भर पडली असून एकट्या मुंबई पालिका क्षेत्रातच ११ हजारांवर नवीन रुग्ण आढळून आले आहेत. पुणे आणि नागपूर या शहरांतील आकडेही काळजीत भर टाकणारे आहेत. पुणे महापालिका हद्दीत गेल्या २४ तासांत ६ हजार ३२१ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर नागपूर पालिका हद्दीत ३ हजार १११ नवे बाधित आढळले आहेत.
Maharashtra reports 57,074 new COVID cases, 27,508 recoveries, and 222 deaths in the last 24 hours
Total cases: 30,10,597
Active cases: 4,30,503
Total recoveries: 25,22,823
Death toll: 55,878 pic.twitter.com/A9CnzkEbc8— ANI (@ANI) April 4, 2021
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ४ लाख ३० हजार ५०३ इतका झाला असून त्यात पुणे जिल्हा पहिल्या स्थानी आहे. पुणे जिल्ह्यात सध्या ८१ हजार ३१७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ मुंबई पालिका क्षेत्रात ६६ हजार ८०३ रुग्णांवर उपचार सुरू असून नागपूर जिल्ह्यात ५३ हजार ६३८ तर ठाणे जिल्ह्यात ५३ हजार २३० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
करोनाची आजची स्थिती
– राज्यात आज २७ हजार ५०८ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
– आजपर्यंत एकूण २५ लाख २२ हजार ८२३ करोना बाधित रुग्ण झाले बरे.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.८ टक्के एवढे.
– गेल्या २४ तासांत राज्यात ५७ हजार ७४ नवीन रुग्णांचे निदान.
– राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहचली ४ लाख ३० हजार ५०३ वर.
– राज्यात आज २२२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
– सध्या राज्यातील करोना मृत्यूदर १.८६ % एवढा.
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ५ लाख ४० हजार १११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३० लाख १० हजार ५९७ (१४.६६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या राज्यात २२,०५,८९९ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर १९,७११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये.