नक्सली हल्ल्यावरून शरद पवारांचा मुख्यमंत्रांवर प्रहार म्हणाले , ज्यांना ‘जनाची नाही तरी मनाची’ लाज असते अशांकडून राजीनाम्याची अपेक्षा काय ठेवणार ?

गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. ज्यांना 'जनाची नाही तरी मनाची' लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही.
#naxalattack @CMOMaharashtra— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 1, 2019
जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात १५ जवान शहीद झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच, या हल्ल्याचा निषेधही नोंदवला आहे. त्यानंतर, माजी संरक्षणमंत्री आणि खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले आहे. तसेच, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध व मृत्यूमुखी पडलेल्या जवानांबद्दल दु:ख व्यक्त करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असेही पवारांनी म्हटले आहे.