बिहारमध्ये सैराट – मुलीसह जावयाची आणि नातीची गोळ्या झाडून हत्या

बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात सैराटसारखीच घटना घडली. प्रेमविवाह केल्यामुळे वडिलांनी मुलीसह जावयाची आणि नातीची निर्घृण हत्या केली. तीन वर्षांपूर्वी कुटुंबीयांच्याविरोधात जाऊन विवाह केल्याच्या रागात वडिलांनी मुलीगी, जावई आणि नातवाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
चंदन कुमार, चंदा कुमारी आणि त्यांची मुलगी अशी पीडितांची नावे आहेत. नौगाछियाच्या गोपाळपूर पोलीस स्टेशन हद्दीतील नवतोलिया गावात हे तिघे आले असता या तिघांवर हल्ला करण्यात आला.
स्थानिकांनी सांगितले की, आरोपी वडिल पप्पू सिंग आणि त्याचा मुलगा धीरज सिंग यांनी प्रथम त्याच्यावर रॉडने वार केले. त्यानंतर आरोपी वडिलांनी जावयाच्या डोक्यात आणि मुलीच्या छातीत गोळी झाडली, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान संतप्त वडिलांनी दीड वर्षाच्या मुलीलाही सोडले नाही, मुलाचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच गोपाळपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी आले असून त्यांनी कुटुंबीयांच्या हत्येचा तपास सुरू केला आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline
www.mahanayakonline.com
For advertising call now :
9421379055 | 9028150765