CongressNewsUpdate : राहुल गांधी यांची ‘अग्निपथ’वरून मोदी सरकारवर टीका…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘प्रयोगशाळे’च्या या ‘नव्या प्रयोगा’मुळे देशाची सुरक्षा आणि तरुणांचे भविष्य धोक्यात आले आहे, असे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘अग्निपथ’ या लष्करी भरती योजनेवर रविवारी केंद्रावर निशाणा साधला. . गांधींनी ट्विट केले की, ‘दरवर्षी 60,000 सैनिक निवृत्त होतात आणि त्यापैकी फक्त 3,000 लोकांनाच सरकारी नोकऱ्या मिळत आहेत.’
60,000 सैनिक हर साल रिटायर होते हैं, उनमें से सिर्फ 3000 को सरकारी नौकरी मिल रही है।
4 साल के ठेके पर हज़ारों की संख्या में रिटायर होने वाले अग्निवीरों का भविष्य क्या होगा?
प्रधानमंत्री की प्रयोगशाला के इस नए Experiment से देश की सुरक्षा और युवाओं का भविष्य दोनों खतरे में हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 24, 2022
चार वर्षांच्या करारानंतर हजारोंच्या संख्येने निवृत्त होणाऱ्या अग्निवीरांचे भवितव्य काय असेल, ? असा प्रश्न उपस्थित करून राहुल गांधी म्हणाले, ‘पंतप्रधानांच्या प्रयोगशाळेच्या या नव्या प्रयोगाने देशाची सुरक्षा आणि तरुणांचे भविष्य दोन्ही धोक्यात आले आहे.’
या योजनेंतर्गत 17 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांना केवळ चार वर्षांसाठी भरती करण्याची तरतूद आहे, त्यापैकी 25 टक्के अधिक 15 वर्षे सैन्यात असतील. ही योजना जाहीर झाल्यानंतर देशाच्या अनेक भागांत निदर्शने झाली. 2022 साठी उच्च वयोमर्यादा 23 वर्षे करण्यात आली आहे.