MaharashtraUnlockNewsUpdate : राज्यातील या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले काय सुरु ? काय बंद ?

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी काल आपल्या भाषणात एकही १५ दिवस राज्यात लॉकडाऊन सदृश परिस्थिती राहणार असल्याचे जाहीर केले असले तरी त्या त्या जिल्हा प्रशासनाला सर्वाधिकार देण्यात आले होते. त्यानुसार आज बहुतेक जिल्हाधिकाऱ्यांनी आपापले आदेश जरी केले आहेत . यापैकी काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे, तर काही ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार वाशिम, सांगली, नंदुरबार, यवतमाळ कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे या जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निश्चित केलेल्या निकषांनुसार उद्यापासून (1 जून) सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. या संदर्भातील अधिकृत आदेश आज काढले आहेत.
मुंबईत शनिवार -रविवार इतर दुकाने बंद
मुंबईमध्ये सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सर्व अत्यावश्यक आणि बिगर अत्यावश्यक दुकाने सुरु राहतील. दुकाने सुरु करण्यासाठी सम-विषम फॉर्म्युला वापरण्यात आला आहे. रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवार तर दुसऱ्या बाजूची दुकाने मंगळवार आणि गुरुवार अशी सुरु राहतील. तर शनिवार रविवार आवश्यकतेनुसार दुकाने बंद राहतील.
औरंगाबाद जिल्ह्यात काय सुरु काय बंद ?
अत्यावश्यक सेवा :
१. औरंगाबाद महानगरपालिकेसह संपूर्ण जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 वाजेपयंत सुरु राहतील.
२. बँक : सर्व दिवस सुरु राहतील
३. अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 वाजेपयंत सुरु राहतील.
४. सर्व मॉल बंद
५. घरपोच सेवा सुविधा : आधीच्या आदेशाप्रमाणे सुरु राहतील.
६. ई- कॉमर्स सेवा आधीच्या आदेशाप्रमाणे सुरु राहतील.
७. वैद्यकीय सेवा : अत्यावश्यक कारण : दररोज दुपारी 3.00 वाजेनंतरही सुरु राहतील. अत्यावश्यक कारणाशिवाय फिरत येणार नाही.
८. शासकीय / जनमशासकीय कायाालये : २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीने सुरु राहतील.
९. कृषी आस्थापना : दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील.
१०. मालवाहतुक: कोणतेही निर्बंध नाहीत मात्र विक्रीस परवानगी नाही.
वाशिम जिल्ह्यात काय सुरू काय बंद?
सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार
अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने शनिवारी, रविवारी बंद
हॉटेल, रेस्टॉरंट, मद्य विक्री खानावळीमध्ये केवळ घरपोच पार्सल सेवेस मुभा
पेट्रोल डिझेल सेवा 2 वाजेपर्यंत सुरू
अत्यावश्यक सेवा कृषी सेवा वाहन 24 तास सुरू
सांगली काय सुरू काय बंद?
अत्यावश्यक सेवेमधील सर्व किराणा दुकाने, फळं आणि दूध, बेकरी ,खाद्य आणि मटण दुकान 7 ते 11 सुरू राहणार
भाजी मंडई हे सकाळी 7 ते 11 सुरू राहतील मात्र आठवडा बाजार बंद राहतील.
2 जून पासून अत्यावश्यक सेवेसोबतच इतर दुकानेही सकाळी 7 ते 2 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी
यवतमाळ काय सुरू काय बंद?
जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेसोबत इतर सेवेची दुकाने 2 जूनपासून सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू
केवळ कृषिशी संबंधित दुकाने 3 वाजेपर्यंत सुरू
अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने शनिवार आणि रविवार बंद
नंदुरबार काय सुरू काय बंद?
सर्वच व्यापारी आस्थापना दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार
कृषी संदर्भातील आस्थापना 6 वाजेपर्यंत सुरू राहणार
रात्रीची संचारबंदी कायम
अकोला जिल्ह्यात काय सुरू काय बंद?
सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकानं, पेट्रोलपंप राहतील सुरू
बँका 10 ते 3 या वेळेत सुरू
रत्नागिरी जिलह्यात काय सुरू काय बंद?
दुध व किराणा मालाची दुकाने यांना केवळ घरपोच सेवा सकाळी 07.00 ते 11.00 या वेळेत पुरविता येईल.
रत्नागिरी जिल्ह्याच्या सिमा अन्य जिल्हयातून प्रवेश करणेस किंवा अन्य जिल्ह्यात प्रवास करणेस बंद करणेत येत आहेत.
केवळ नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी वैदयकिय उपचारासाठी किंवा निकडीच्या 1 आणिबाणीच्या प्रसंगी रत्नागिरी जिल्हयात प्रवेश करणेस किंवा रत्नागिरी जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात प्रवास करणेस मुभा राहील.
जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस 48 तास अगोदर केलेली कोव्हीड-19 निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र सोबत असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही
मालवाहतुकीसाठी कोणतेही बंधन असणार नाही.
शेतीच्या पेरणीचा हंगाम विचारात घेता कृषिविषयक संलग्न सर्व दुकाने सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 या काळात सुरु ठेवणेस मुभा
पिंपरी चिंचवड 1 जून ते 10 जूनसाठी नवी नियमावली काय सुरू काय बंद?
अत्यावश्यक दुकानांशिवाय इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू
सर्व बँका खुल्या असणार
हॉटेल, रेस्टॉरंट, मद्य विक्री खानावळीमध्ये केवळ घरपोच पार्सल सेवेस मुभा
मद्यविक्रीची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 खुली राहणार
ई कॉमर्समार्फत अत्यावश्यक वस्तू आणि सेवा यांची घरपोच सेवा करण्याची मुभा
दुपारी 3 नंतर अत्यावश्यक कारण वगळता कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही
कृषी संबंधित दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू
परभणीत काय सुरू काय बंद?
किराणा,भाजीपाला,फळ विक्रेत्यांना सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मुभा
शनिवार व रविवार सर्व बंद
शेती संबंधित निगडीत सर्व दुकाने, बाजार समिती, मोंढा, आडत बाजार यांना आठवड्याचे सर्व दिवस सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत परवानगी