IndiaNewsUpdate : शेतकरी आंदोलन : सरकारची चर्चेची आज पाचवी फेरी , आंदोलक शेतकरी अधिक आक्रमक

मोदी सरकारने केलेल्या तिन्हीही नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. कृषी विधेयके संसदेत मंजुर झाल्यानंतर राज्याराज्यात आंदोलन करणारे शेतकरी कायदा अस्तित्वात आल्यानंतर दिल्लीवर धडक दिली आहे . गेल्या आठवडाभरापासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर मुक्काम ठोकला असून, सरकारसोबत चर्चाही सुरू आहे. आतापर्यंत चार फेऱ्या पार पडल्या असल्या तरी शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून, आता संसदेला घेराव घालण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.
Delhi: Farmers continue to hold a sit-in protest at Chilla border (Delhi-Noida Link Road) against the Centre's #FarmLaws.
A farmer says, "If anything concrete doesn't happen in today's meeting with the Central government then we will gherao the Parliament." pic.twitter.com/4mPOeAm9Xm
— ANI (@ANI) December 5, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कृषी क्षेत्र अधिक खुले करण्याचा दावा करून हे तीन कृषी कायदे पास करून घेतले आहेत . या कायद्यांना शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होताना दिसत आहे. दरम्यान या विधेयकाच्या विरोधात देशातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे . मात्र, या असंतोषाची सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’ची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत आंदोलनासाठी दिल्लीवर कूच करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच सरकारकडून रोखण्यात आलं. गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. तर सहा महिन्यापर्यंत आंदोलन करण्याच्या तयारीने हे शेतकरी आले आहेत.
दरम्यान हे आंदोलन थांबविण्यासाठी आज दुपारी दोन वाजता केंद्र सरकार व शेतकऱ्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरी होत आहे. या बैठकीत सरकारनं मागण्या मान्य केल्या नाही, तर संसेदला घेराव घालू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या बैठकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, वाणिज्य मंत्री पियूष गोयल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी दाखल झाले आहेत. आज होणाऱ्या बैठकीसंदर्भात पंतप्रधानांसोबत चर्चा केली जाणार असून, त्यानंतर शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचं शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. त्यामुळे पाचव्या फेरीत तोडगा निघतो की, आंदोलन अधिक तीव्र होणार हे या बैठकीनंतरच ठरणार आहे.
A meeting is scheduled with farmers at 2 pm today. I am very hopeful that farmers will think positively and end their agitation: Union Agriculture Minister Narendra Singh Tomar pic.twitter.com/tC8fZylo9m
— ANI (@ANI) December 5, 2020