SushantSinghRajputDeathCase : सुशांतच्या वडिलांचे न्यायालयाला भावनिक पत्र….

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याचे वडील केके सिंह यांनी सवोच्च न्यायालयात आज लिखित स्वरुपात उत्तर दिले आहे. चितेला अग्नी देणारा माझा मुलगा हिरावून घेतला अशा भावना त्यांनी या पात्रात नमूद केल्या आहेत. पाटना पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचा हक्क असल्याचे केके सिंह यांनी या पात्रातम्हटले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर केस ट्रान्सफर होऊ शकते. पाटनामध्ये असताना अनेकवेळा सुशांतशी बोलण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. रिया चक्रवर्तीने स्वतः सीबीआय चौकशीची मागणी केली होती. माझा मुंबई पोलिसांच्या तपासावर विश्वास नाही, शवविच्छेदनानंतरही त्यांनी एफआयआर दाखल केली नसल्याचे केके सिंह म्हणाले. याअगोदर बिहार सरकार आणि रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात उत्तर दिले आहे.
या प्रकरणात बिहार सरकार म्हणाले, की मुंबई पोलिसांनी कोणतीही एफआयआर दाखल केली नाही. एकमेव एफआयआर बिहारमध्ये नोंदवली आहे. आता तपास सीबीआयकडे गेला आहे. त्यामुळे पाटनावरुन केस मुंबईला ट्रांन्सफर करण्याच्या रियाची मागणीला अर्थ नाही. तर रिया चक्रवर्ती म्हणाली, ”पाटणामध्ये तक्रार दाखल करण्याला काही आधार नाही. हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची बिहार सरकारची मागणी देखील चुकीची आहे. एफआयआरमध्ये ज्या शक्यता व्यक्त करण्यात आल्या आहेत, त्यावरुन कोणत्याही गुन्ह्याची गोष्ट समोर येत नाही.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपासाचा निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालयाने सांगितले, की सर्व पक्षाचे वकील 13 ऑगस्ट म्हणजे आज आपापली बाजू संक्षिप्त स्वरुपात कोर्टात सादर करू शकतात. सुशांत सिंह राजपूत 14 जूनला मुंबईतील आपल्या अपार्टमेंटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. मुंबई पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत . पाटना पोलिसांनीही एफआयआर दाखल केली आहे. याच एफआयआरला रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.