MaharashtraUnlockUpdate : राज्यातील वाहनधारकांसाठी असे आहेत नवे नियम…

केंद्र शासनाप्रमाणेच राज्यातील लॉकडाउनची मुदतही वाढवण्यात आली असून आता ३१ ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये लॉकडाउन कायम राहणार आहे. कंटेंटमेंट झोनमध्ये निर्बंध कायम राहणार असले तरी काही दिलासा देणारे निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. यामध्ये प्रामुख्याने वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढवण्याची परवानगी देण्यात आली. सर्व सामान्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे, दुचाकीवर दोन जणांना प्रवास करण्यास परवानगी देण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शहरांमध्ये दुचाकीवर केवळ एकाच व्यक्तीला प्रवास करण्याची मूभा देण्यात आली होती. तर चारचाकी वाहनधारकांनाही दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या नव्या नियमांनुसार मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाअंतर्गत म्हणजेच एमएमआर अंतर्गत येणाऱ्या शहरांबरोबरच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूरमध्ये वाहनांमधून अधिक प्रवाशांना नेण्याची मूभा देण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेशाअंतर्गत म्हणजेच एमएमआरमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे जिल्ह्याचा संपूर्ण भाग, तर पालघर आणि रायगड जिल्ह्याचा काही भागाचा समावेश होत असल्याने तेथेही ही सूट देण्यात आली आहे. सरकारने या शहरांमध्ये कशाला परवानगी आहे यासंदर्भातील यादी दिली असून यामध्ये ‘अ’ विभागातील सूचनांनुसार २० वा मुद्दा हा वाहनांमधून प्रवासासंदर्भातील आहे. तर क भागातील सूचनांनुसार १२ व्या मुद्द्यानुसार या शहरांबरोबरच राज्यातील इतर शहरांमध्येही हेच नियम लागू करण्यात येणार आहेत.
असे असतील नवे नियम