CoronaMaharashtraUpdate : सरकारचा माहिती देण्याचा क्रम बघा । 1047 पोलिसांना कोरोनाची बाधा, मृत्युमुखी पडलेले पोलीस – ५९

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३७ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. विविध गुन्ह्यांसाठी ९ कोटी ५२ लाख ३० हजार ३६१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्यात ६ लाख ७ हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख २९ हजार ५४६ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २८ जून या कालावधीत
पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – २९० (८६० व्यक्ती ताब्यात)
१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०५ हजार ०३७
राज्यात एकूण क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती – ६ लाख ०७ हजार ८२५.
अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३३५
जप्त केलेली वाहने – ८५ हजार ४६७.