#CoronaVirusEffect : जमात-उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना महमूद मदनी यांची मरकज प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया , नमाजच्या नावाखाली सोशल डिस्टन्सिंग न पाळणं हराम….

कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नयेयासाठी सर्व मुस्लीम कटिबद्ध आहेत. सोशल डिस्टन्सिंगची अमलबजावणी करणं अत्यंत गरजेचे असून नमाजच्या वेळी देखील याचं पालन झालं पाहिजे असे मौलाना महमूद मदनी यांनी म्हटले आहे. इतकंच नाही तर नमाजच्या नावाखाली सोशल डिस्टन्सिंग न पाळणं हराम असल्याचं ते म्हणाले आहेत. मुस्लीम धर्म किंवा नमाजच्या नावाखाली सोशल डिस्टन्सिंग तसंच लॉकडाउन न पाळण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्यांचा जमात-उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मौलाना महमूद मदनी यांनी निषेध केला आहे.
मौलाना महमूद मदनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. “भारतात १० लाख मशिदी आहेत. सर्वजण सरकारकच्या आदेशांचं पालन करत आहेत.करोनाविरोधातील लढाईत आम्ही सगळे एकत्र आहोत. भारतातील मुस्लीम १०० टक्के देशासोबत असून अशीच साथ देत राहू,” असं मौलाना महमूद मदनी यांनीम्हटलं आहे. तबलिगी जमात मकरजचे प्रमुख मौलाना साद यांच्या कथित ऑडिओ क्लिपवरही मौलाना महमूद मदनी यांनी मत माडंलं आहे.या ऑडिओ क्लिपमध्ये मौलाना साद सांगत आहेतकी, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याची काही गरज नाही. मुस्लिमांना त्यांच्या धर्मापासून दूर ठेवण्यासाठी करोनाच्या नावाखाली हा कट आहे. मौलाना महमूद मदनी यांनीहे अत्यंत चुकीचं वक्तव्य असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान ही ऑडिओ क्लिप खरी आहे की खोटी हे तपासणं गरजेचं असल्याचं मौलाना महमूद मदनी यांनी म्हटलं आहे. पण पुढे बोलताना जर ही खरी असेल तर हा अत्यंत चुकीचा संदेश असल्याचं ते म्हणाले आहेत. दरम्यान जमियत-उलेमा-ए-हिंदच्या प्रमुखांनी सरकार आणि प्रशासनाला तबलिगी जमातच्या सदस्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागवू नये असं म्हटलं आहे. हे प्रकरण माणुसकीने सोडवलं पाहिजे. द्वेषाने नाही. मरकजच्या सदस्यांना सुरक्षित वाटेल ही सरकारची जबाबदारी आहे. त्यांना योग्य ती वैद्यकीय मदत पुरवली पाहिजे. शिक्षा किंवा खटल्याची प्रक्रिया नंतरही होऊ शकते असंते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व सदस्यांनी पुढे येऊन माहिती दिली पाहिजे असं आवाहनही केलं आहे. मौलाना महमूद मदनी यांनी यावेळी तबलिगी जमातचा कार्यक्रम दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.
मौलाना महमूद मदनी असेही म्हणाले कि , जी माहिती समोर येत आहे त्यावरुन तरी जे काही झालंते दुर्दैवी आणि गुन्हा आहे. पण याची अजून एक बाजू आहे जी समोर येत आहे. ती खरी आहे की खोटी माहिती नाही. हे जाणुनबुजून केलं होतं का याची अद्याप कल्पना नाही. पण कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम व्हायला नको होता असं ते म्हणाले आहेत. तबलिगी जमातच्या सदस्यांकडूनडॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारा हल्ला चुकीचा असल्याचं ते म्हणाले आहेत.डॉक्टर आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा आदर केला पाहिजे. त्यांच्यावर हल्ला करणे गुन्हाअसून हे एका हत्येप्रमाणे आहे. जर कोणी सोशल डिस्टन्सिंग पाळत नसेल किंवा लपत असेलतर ते अल्लाहला नाराज करत आहेत. आपल्याला किंवा दुसऱ्याला अशा पद्धतीने धोक्यात घालणं मुस्लीम व्यक्तीसाठी हराम आहे असंही त्यांनी सांगितलं आहे.