मुंबईसह तीन जिल्ह्यात सुटी जाहीर, राज्य सरकारचा निर्णय , मातोश्रीलाही पावसाचा फटका

मुंबई तसंच उपनगरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही बसला आहे. उद्धव ठाकरे राहत असलेल्या कलनागर परिसरात पाणी साचलं आहे. महापालिकेचा कारभार शिवसेनेकडे असून शिवसेना प्रमुखांनाच पावसाचा फटका बसला असून मातोश्रीचा परिसर जलमय झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. वांद्रे येथील कलानगर, सरकारी वसाहत, शास्त्री वसाहत आणि एमआयजी ग्राऊंड परिसरात पाणी साचलं आहे.
दरम्यान गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून हे ट्विट करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरात गुडघाभर पाणी शिरलं आहे. यासंदर्भातले फोटो त्यांनी ट्विट करत करून दाखवलं असं वाक्यही त्यासोबत लिहिलं आहे आणि शिवसेनेला टोला लगावला आहे. सोमवारी रात्रीपासून झालेल्या पावसाने मुंबईला झोडपून काढले आहे. त्यामुळे मुंबईतल्या लोकलसेवेवर परिणाम झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांच्या घरातले फोटो ट्विट करून मुंबई महापालिकेचे आभार मानले आहेत. तसेच करून दाखवले असं म्हणत शिवसेनेलाही टोला लगावला आहे.
करून दाखवलं असं ट्विट करून नवाब मलिक यांनी घरात आणि घराबाहेर साठलेल्या पाण्याबाबत शिवसेनेला टोला दाखवला आहे. करून दाखवलं हे शिवसेनेचे ब्रीद वाक्य आहे. एखादं काम केल्यानंतर शिवसेना कायम या प्रकारचे होर्डिंग लावत असते. आता याच वाक्याचा संदर्भ घेत नवाब मलिक यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
पावसाने उडवली दाणादाण, लोकल सेवा ठप्प; सरकारी सुट्टी जाहीर
मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते मात्र मुंबईत रात्रभर पडलेल्या पावसामुळे या लोकल सेवेचे तीन तेरा वाजवले आहेत. आज पहाटेपासूनच लोकल सेवा बंद असल्याच्या घोषणा विविध स्टेशनवर केल्या जात आहेत. डोंबिवली ते ठाणे हे स्लो लोकलने वीस मिनिटात कापले जाणारे अंतर कापण्यासाठी दीड ते दोन तास लागत आहेत. मध्य रेल्वेच्या सर्व लोकल्स ठाण्यापर्यंत मुंगीच्या गतीने जात असून त्यापुढे पुढील सूचना मिळेपर्यंत लोकलसेवा बंद ठेवण्यात आली आहे. मुंबईतल्या लोकलसेवेला पावसाने ब्रेक लावला आहे.