नथुराम गोडसे देशभक्त होते, देशभक्त आहेत आणि देशभक्तच राहणार , साध्वीच्या विधानाचा भाजपकडून तत्काळ निषेध

GVL Narasimha Rao, BJP on Pragya Singh Thakur's statement "Nathuram Godse was, is & will remain a 'deshbhakt": BJP does not agree with this statement, we condemn it. Party will ask her for clarification, she should apologise publicly for this statement. pic.twitter.com/yBEs8nQoWW
— ANI (@ANI) May 16, 2019
महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्याने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली असून भाजपने यावरून साध्वीची कानउघाडणी करत जाहीरपणे माफी मागण्याबाबत बजावले आहे. मक्कल निधी मय्यम पक्षाचे सर्वेसर्वा आणि अभिनेता कमल हासन यांनी नथुराम गोडसे हा स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिला दहशतवादी होता, असे विधान केले आहे. याबाबत साध्वी प्रज्ञाची प्रतिक्रिया मागितली असता, नथुराम गोडसे देशभक्त होते, देशभक्त आहेत आणि देशभक्तच राहणार आहेत. त्यांना हिंदू दहशतवादी म्हणणाऱ्यांनी आधी आपण स्वत: काय आहोत, हे पाहायला हवे. अशा व्यक्तींना जनता निवडणुकीत धडा शिकवेल’, असे ती म्हणाली होती.
साध्वीच्या या विधानाने नवा वाद उभा राहिला असून भाजपने तातडीने यावर पक्षाची भूमिका स्पष्ट करत साध्वीची कानउघाडणी केली आहे. साध्वीच्या या विधानाशी भाजप सहमत नाही. या विधानाचा आम्ही निषेध करत आहोत. साध्वींकडे याबाबत स्पष्टीकरण मागितले जाईल. त्यांनी यावर निवेदनाद्वारे जाहीर माफी मागावी, अशी अपेक्षा आहे, असे जीव्हीएल नरसिंह राव यांनी सांगितले.