MumbaiNewsUpdate : मोठी बातमी : परमबीर सिंह यांची याचिका , उच्च न्यायालयाने उपस्थित केला महत्वाचा प्रश्न !!

मुंबई : बदल्यांच्या बाबतीतील याचिका जनहित याचिका कशी असू शकते असा प्रश्न मुंबई उच्चन्यायालयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना विचारला आहे त्यावर आम्ही याचे उद्या उत्तर देऊ असे परमबीर सिंह यांच्या वकिलाने न्यायालयासमोर सांगितले . गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची आणि त्यांच्या कारभाराची केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे (सीबीआय) चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यासाठी परमबीर यांनी फौजदारी जनहित याचिकेद्वारे केली आहे. दरम्यान उच्च न्यायालायने बुधवारी तातडीची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Bombay High Court To Hear Param Bir Singh's Plea Seeking CBI Probe In To Allegation Of Corruption Against HM Anil Deshmukh Tomorrow @AnilDeshmukhNCP,@MumbaiPolice,@OfficeofUT https://t.co/7ulf7uITuj
— Live Law (@LiveLawIndia) March 30, 2021
प्रारंभी हाच विषय घेऊन बदलीमुळे नाराज झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह सर्वोच्च न्यायालयात गेले होते परंतु तुम्ही आधी हायकोर्टात का गेला नाहीत अशी विचारणा केल्यानंतर सिंह यांनी आपली याचिका मागे घेऊन मुंबई उच्च न्यायालयात आपले म्हणणे कायम ठेवले परंतु जनहित याचिका दाखल केली. सदर याचिका सुनानीस घेताना उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांनी केलेल्या जनहित याचिकेवर प्रश्न उपस्थित केला. मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. मागण्यांवर बोट ठेवत याचिका जनहित याचिका कशी? असा प्रश्न उच्च न्यायालयाने केला. न्यायालयाच्या प्रश्नानंतर परमबीर यांच्या वकिलाने जनहित याचिका कशी ? हे उद्या होणाऱ्या सुनावणीदरम्यान पटवून देण्याचा म्हटले. दरम्यान याचिकेवर बुधवारी तातडीची सुनावणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
परमबीर यांनी पोलिसांच्या नियुक्त्या, बदल्यांसाठी देशमुख पैशांची मागणी करतात, तपासकार्यात ते वारंवार हस्तक्षेप करतात, असे आरोप याचिकेत केले आहेत. त्यासाठी त्यांनी राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा, निलंबित अधिकारी सचिन वाझे व संजय पाटील यांना महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचे दिलेले लक्ष्य तसेच दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचा दाखला दिला आहे. तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फत चौकशी होणे गरजेचे असून, तसे आदेश देण्याची मागणी परमबीर यांची मागणी आहे.
देशमुख हे तपासकार्यात वारंवार हस्तक्षेप करतात, दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी भाजपच्या नेत्यांना गोवण्यासाठी त्यांनी दबाव आणला होता, असा आरोपही परमबीर यांनी केला. देशमुख यांच्याकडून होत असलेल्या खंडणीच्या मागणीबाबत आणि पोलिसांच्या बदल्या, नियुक्त्यांमधील भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारमधील अन्य वरिष्ठ नेत्यांना माहिती दिली होती. मात्र, त्यानंतर लगेचच १७ मार्चला आपल्याला मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवून गृहरक्षक दलात बदली करण्यात आली. आयुक्तपदी दोन वर्षे पूर्ण करण्याआधीच ही बदली करण्यात आली. त्यामुळे हा निर्णय मनमानी आणि बेकायदा आहे, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. परंतु हि याचिका जनहित याचिका कशी होऊ शकते असा न्यायालयाचा प्रश्न आहे.
आपल्या बदलीनंतर देशमुख यांनी एका मुलाखतीत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके आढळल्याप्रकरणी तपासात आपल्याकडून चुका राहिल्याची टिप्पणी केली होती. परंतु, या प्रकरणाच्या तपासासाठी आयुक्त कार्यालयाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले गेले, त्यामुळे आपली बदली मनमानी, बेकायदा आल्याचा दावा परमबीर यांनी केला.