देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८३ हजार ८७७ रुग्ण सापडले तर १ हजार ०४३ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. देशातील एकूण मृत्यूंची संख्या आता ६७ हजार ३७६ झाली आहे. आकडेवारीनुसार, देशातील रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७७.०८ टक्क्यांपर्यंत आहे. मृत्यू र १.७४ टक्के तर पॉझिटिव्हिटी रेट ७.१५ टक्क्यांवर आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत ६८ हजार ५८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. देशात आत्तापर्यंत २९ लाख ७० हजार ४९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ८ लाख १५ हजार ५३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.