Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली बातमी : भाजपचा नेताच म्हणतो ४० हजार कोटींसाठी देवेंद्र फडणवीस बनले तात्पुरते मुख्यमंत्री, तर फडणवीस म्हणतात असे काहीच घडले नाही….

Spread the love

महाविकास आघाडीच्या सरकारकडून केंद्र सरकारच्या ४०,००० कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांना बहुमत नसतानाही मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे. कर्नाटकात शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केला. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान या बातमीत काहीही तथ्य नसून हि माहिती धादांत खोटी असल्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी या प्रकरणी चौकशी केल्यानंतर बोलू असा पवित्र घेतला आहे. राज्यात सध्या हा विषय चर्चेचा झाला आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार हेगडे म्हणाले, “केंद्र सरकारचा ४०,००० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पडून होता. दरम्यान, फडणवीस यांना माहिती होते की जर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार सत्तेत आले तर ते विकासाच्या नावाखाली या निधीचा गैरवापर करतील. त्यामुळेच हा निधी परत केंद्राकडे पाठवण्यासाठी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचं नाटक करण्याचं ठरलं. त्यानुसार, फडणवीस हे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर १५ तासांत त्यांनी ४०,००० कोटी रुपये पुन्हा केंद्राकडे पाठवून दिले.”

“तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आमचा माणूस महाराष्ट्रात ८० तासांसाठी मुख्यमंत्री बनला होता. त्यानंतर फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी हे नाटक कशासाठी केलं? बहुमत नसतानाही ते मुख्यमंत्री कसे झाले? असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत. त्याचे हे उत्तर आहे, असेही हेगडे यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!