Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गुजरातची पोकळी भाजपने भरुन काढली… – शरद पवार

Spread the love

बहुचर्चित गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालकडे सर्वांचेच लक्ष होते. गुजरातमध्ये भाजपचा विजय निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गुजरात निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल याबद्दल कुणाच्याही मनात शंका नव्हती. अनेक निर्णय एका राज्याला सोयीचे घेतले गेले. अनेक प्रकल्प त्या राज्यात कसे जातील याची काळजी घेण्यात आली, त्याचा हा परिणाम होणार हे सर्वांना माहिती होते.

मुंबई येथे शरद पवार म्हणाले कि, “देशात एक वेगळे वातावरण आहे नुकतेच निवडणुका पार पडल्या. या निवडणुका एक वेगळी दिशा दाखवायला लागली आहे. गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल याबद्दल कुणाच्याही मनात शंका नव्हती. अनेक निर्णय एका राज्याला सोयीचे घेतले गेले. अनेक प्रकल्प त्या राज्यात कसे जातील याची काळजी घेण्यात आली. त्याचा हा परिणाम होणार हे सर्वांना माहिती होते, तसा निकाल आता पाहायला मिळत आहे. पण गुजरातचा निकाल लागला याचा अर्थ देशात एका बाजूने मतप्रवाह आहे असा नाही. कारण दिल्ली महापालिकेत भाजपची सत्ता आपने खेचून आणली” “हिमाचल मध्ये भाजपचे राज्य होते त्या ठिकाणी आता काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या आहेत.भाजपचे राज्य गेले आहे. दिल्लीमध्ये गेले, पंजाबमध्ये देखील गेले आणि आता हिमाचलमध्ये देखील राज्य गेले आहे. याचा अर्थ हळूहळू आता बदल व्हायला लागला आहे.

राजकारणात अनेक वेळा पोकळी असते. गुजरातची पोकळी भाजपने भरुन काढली आणि दिल्लीची पोकळी केजरीवालांनी भरुन काढली. देशातील अनेक लोकांना बदल हवे आहेत, याची नोंद राजकीय कार्यकर्त्यांना घ्यायला हवी. ही पोकळी कशी भरुन काढायची याचा विचार करायला हवा. ही पोकळी आता लवकरच भरुन काढण्यासाठी आपण तयारीला लागले पाहिजे. आता आपल्याला एकत्र येऊन राजकारण करणे गरजेचे आहे. आपण कमीत कमी भाजपच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध असणाऱ्या शक्ती एकत्रित कशा करायच्या याची तयारी केली पाहिजे, विरोधी पक्षांच्या मीटिंगसाठी राष्ट्रवादीने पुढाकार घेतला, इथे देखील आपण पुढाकार घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत, हेच आता कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवे की आपण ही पोकळी भरुन काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यासाठी सर्वांनी तयार राहिले पाहिजे.

दरम्यान, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत म्हणून दुर्लक्ष करायला नको. आपण आपले काम चालूच ठेवले पाहिजे. या निवडणुकीत नवी पिढी कशी आणता येईल यासाठी प्रयत्न करायला हवेत. ही निवड करताना शक्यतो त्या ठिकाणचा जो तरुण कार्यकर्ता आहे त्याला डावलू नये, त्याला संधी दिली पाहिजे. निकाल पार पडल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात यायला हवे की राष्ट्रवादीने दुसरी फळी तयार केली आहे, असे शरद पवार म्हणाले.

ElectionNewsLiveUpdate : गुजरातमध्ये भाजप आघाडीवर तर हिमाचलमध्ये काँग्रेस -भाजपमध्ये टक्कर …

गुजरातमध्ये मतमोजणी केंद्रातच आत्महत्येचा प्रयत्न


News Update on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!